HW News Marathi
महाराष्ट्र

“आझाद मैदानातील आंदोलन तात्पुरते मागे!” – सदाभाऊ खोत

मुंबई | आझाद मैदानातील आंदोलनचचे तात्पुरते मागे घेतले, अशी घोषणा आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. आंदोलन सुरू ठेवयाचे की नाही, हे कामगारांनी ठरवायचं, असे मत खोतांनी आज (२५ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना सांगितले. कामगारांच्या वेतनात भरघोस वाढ झाली आहे. आपण पहिला टप्पा जिंकल्याचे खोतांनी सांगितले. एसटी कामगारांच्या दुसऱ्या टप्प्यातील लढाईला आमचा पाठिंबा राहिल,असेही राऊत यावेळी म्हणाले. परंतु विलीनीकरणाचा लढा सुरूच राहणार असेही त्यांनी सांगितले. काही संघटना आंदोलनावर ठाम असून कामगारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे देखील खोत यावेळी म्हणाले.

गेले १६ दिवस कर्मचाऱ्यांसोबत आम्ही ठाण मांडून बसले. एसटी कर्मचाऱ्यांची वेतन वाढ ही मागणी होती. पण ती मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी विलीनीकरणाची मागणी पुढे आली. आता राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना चांगली वेतन वाढ केली आहे. या समितीला विलीनीकरणाचा निर्णय १२ आठवड्याच्या आत समितीने घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. समिती जो अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर मांडला जाईल. यानंतर समितीचा अहवाल उच्च न्यायालयात पाठविला जाणार आहे. “उच्च न्यायालयाने विलीनीकरणाबाबत समिती स्थापन केली आहे. या समितीची जो निर्णय येईल तो आम्ही मान्य करू अशी आमची भूमिका पूर्वीच जाहीर केली होती,” असे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्टे केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शार्पशुटर शंकर भारती यांचा पोलीस अधिक्षक येनपूरे यांच्या हस्ते सत्कार 

News Desk

‘मुंबईतील नोकरदार वर्ग ऑफिसला कसा जाणार?’, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सवाल 

News Desk

अनिल परब, संजय राऊत यांचीही चौकशी करा, चंद्रकांत पाटलांची मागणी

News Desk