HW News Marathi
कृषी

जलयुक्त शिवार अभियान, नरेगा कामांच्या नियोजनाकडे लक्ष द्या – जिल्हाधिकारी डोंगरे

उत्तम बाबळे नांदेड :- जलयुक्त शिवार अभियान, नरेगा, मागेल त्याला शेततळे या कामासाठी व्यवस्थित नियोजन करुन ही योजना गरजु पर्यंत पोहचवण्याचे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जलयुक्त शिवार अभियान, नरेगा, मागेल त्याला शेततळे,वृक्ष लागवड या योजनांचा आढावा घेतांना डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन,नांदेड येथे बोलतांना दिले आहेत.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, वन विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी.एन. कांबळे, कार्यकारी अभियंता (जलसंधारण) व्ही. पी. शाहू यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत साठलेल्या पाण्याचा पुरेपुर वापर झाला पाहिजे. यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. सन 2017-18 मधील गावामध्ये पुढील काळात काम करण्यासाठी आतापासून नियोजन करण्याचे त्यांनी निर्देश दिले. तसेच नरेगाअंतर्गत अकरा कलमी कार्यक्रम, अहिल्यादेवी सिंचन विहिर, अमृतकुंड शेततळे, फळबाग लागवड, भुसंजीवन गांडुळ खत, नाडेप व वृक्ष लागवड, निर्मल शौचालय याबाबत वनविभाग, गटविकास अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला.

बैठकीस जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, आरएफओ, लागवड अधिकारी, उपकार्यकारी अभियंता, उपमुख्य कार्यकारी अभियंता (नरेगा) उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी पुत्राची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

सण बळीराजाच्या सर्जा-राजाचा

Gauri Tilekar

झेंडुच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना दसरा पावला

News Desk