HW News Marathi
कृषी

साखर उद्योगासाठी केंद्र सरकारकडून ४५०० कोटींचे पॅकेज

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्रालयाने साखर उद्योगासाठी गुड न्यूज दिली आहे. सरकारने मंत्रालयाकडून ४५०० कोटीचे पॅकेज दिले. या निर्णयाचा सर्वांधिक फायदा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांना होणार आहे. यंदा २०१८-१९ वर्षासाठी ५ दशलक्ष म्हणजेच ५० लाख टन साखर निर्यातीवर कारखानदारांना अनुदान देण्यात येणार आहे. १३.८८ रुपये प्रति क्विंंटलच्या हिशोबाने हे अनुदान देण्यात येईल. त्यानंतर हे पॅकेज आज मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (सीसीईए) ने आज मंजुरी करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थ मंत्रालयाने अन्न पुरवठा खात्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. देशातील साखरेचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि साखर कारखानदारांकडे असलेली १३,००० कोटी रुपयांची थकबाकी जमा करण्यासाठी अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती. हे पॅकेज देण्याचा प्रस्ताव अन्न मंत्रालयाकडे पाठविला होता. तसेच साखर उद्योगासाठीचे हे दुसरे मोठे पॅकेज आहे. यापुर्वी जून २०१८मध्ये साडे आठ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. यंदाच्या वर्षातील दुसरे मोठे पॅकेज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्नशील – जिल्हाधिकारी डोंगरे 

News Desk

शेतमालास शाश्वत बाजारपेठ व अधिकचा बाजारभाव मिळवून देऊ | शरद पवार

News Desk

केवळ 15 गुंठे जमीनमुळे मजूर झाला बागायतदार

News Desk