HW News Marathi
क्राइम

नक्षल्यांनी केली पंचायत समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्याची हत्या

भामरागड, सशस्त्र नक्षल्यांनी काल(ता.९) बेजूर येथील एका इसमाची हत्या केली. लालसू गुंडी आत्राम(४२) असे मृत इसमाचे नाव असून, तो पंचायत समितीत ट्रायसेम योजनेंतर्गत कंत्राटी तत्त्वावर हातपंप यांत्रिकी म्हणून कार्यरत होता.

मूळचा बेजूर येथील रहिवासी असलेला लालसू आत्राम हा भामरागड येथेच वास्तव्य करीत होता. काल बेजूर येथे ‘मरका’ जत्रा असल्याने तो तेथे गेला होता. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी त्याची हत्या केली. हत्या नेमकी कशासाठी केली, हे समजू शकले नाही. मात्र पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन त्याची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज आहे. या घटनेमुळे दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांसह परिसरातील गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोलंदाज बाद होतात तेव्हा, एकाच्या घरी चोरी, एकाच्या घरावर हल्ला

News Desk

अभिनेत्री कृतिका चौधरी हिच्या हत्येचा तपास करण्यात एक महिन्यानंतर पोलिसांना यश

News Desk

एकवीरा देवीचा सव्वा लाखाचा कळस चोरीला

News Desk