HW News Marathi
क्राइम

30 दिवसात ५ कोटीचा मुद्देमाल जप्त

पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी स्थापलेल्या ” सामान्य विशेष पोलीस पथकाची असामान्य कामगीरी “

उत्तम बाबळे

नांदेड पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी अवैध धंद्याच्या उच्चाटनासाठी १ जून २०१७ रोजी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकास अवघा १ महिना पुर्ण झाला असून १ अधिकारी व १२ कर्मचारी असलेल्या या विशेष पोलीस पथकाने केवळ ३० दिवसात २२ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी अवैध धंद्यावर छापे मारली . या धाडसी कारवाईत ४४ गुन्ह्यात २३३ आरोपींना गजाआड करत जवळपास ५ कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त केले आहे.यामुळे हे पथक अवैध धंदेवाल्यांसाठी कर्दनकाळ ठरले असून शांतताप्रिय नागरीकांच्या अभिनंदनास पात्र ठरले आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या कारभाराचा पदभार स्विकारला व सर्वप्रथम पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी जिल्ह्यात अवैध धंद्यानी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले असल्याची बाब पत्रकारांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली.यावर उत्तर देतांना पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी मी जिल्ह्यात असे पर्यंत अवैध धंदे व धंदेवाल्यांचे समुळ उच्चाटन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून अशा अपप्रवृत्तींनी प्रवेश करण्याची हिंमत करु नये तथा येथे असतील त्यांनी स्वत: निघुन जावे असा इशारा दिला.तसेच सर्व ठाणे प्रभारी पोलीस अधिका-यांना या धंद्यांवर आळा घालावा व ज्यांच्या क्षेत्रात अवैध धंद्याना अभय मिळत असल्याचे निदर्शनास येईल त्यांच्या विरुद्धही कठोर कारवाई करण्यात येईल अशी तंबी दिली.वास्तविक पाहता स्थानिक पोलीस अधिकारी व मर्मचारी,स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आपापला मोठा ताफा आणि बळ याचा योग्य वापर केला तर अवैध धंद्यांवर आळा घालणे कठीण नाही.परंतू असे होत नाही, कर्तव्य तत्परता,जिद्द,चिकाटी व इच्छाशक्तीचा मेळ घातला तर हे करणे सहज शक्य असते.याचा प्रत्यय आणून देण्यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी मे २०१७ च्या शेवटी हिमायतनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली व जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी पो.काॅ.वानखेडे,निरणे,कुलकर्णी,जगताप,लाटकर,जिंकलवाड,गंगुलवार,खंदारे,पायनापल्ले,अवतारीक,लाठकर,चालक देवकते अशा १२ जणांचे विशेष पोलीस पथक स्थापन केले आणि १ जून २०१७ पासून जिल्ह्यातील अवैध धंद्यावर आळा घालण्याची जबाबदारी या पथकावर सोपविली.तसे पाहता अतीशय कमी संख्याबळ असलेले हे एक सामान्य पोलीस पथक,परंतू या पथकाने गेल्या तीस दिवसात प्रतीदिन आपले कर्तव्य पार पाडत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात छापे मारले व अवैध धंदेवाल्यांना सळो की पळो करुन साेडले.अवैध देशी,विदेशी दारु विक्री व विक्रेत्यांवर,गुटखा,मटका,रेती तस्करी,जुगार,क्रिकेट सट्टा जुगार अड्डा आदींवर छापे मारले.पथकातील पोलीस संख्याबळ कमी असल्याने व रात्री अपरात्री,पावसात छापे मारत असतांना आरोपींची संख्या त्या ठिकाणी अधिकची असल्याने प्रसंगी जीव धोक्यात घालून झुंज देत त्यांच्या मुसक्या आवळल्या.२२ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात मारलेल्या छाप्यातील ४४ गुन्ह्यात या पथकाने २३३ आरोपींना गजाआड केले व या धाडसी कारवाईत ४,९३,५४,५८२/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.३० दिवसात एका सामान्य पोलीस पथकाने केलेली ही कारवाई पाहता जर सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ठरविले तर अवैध धंदे आणि धंदेवाले यांचे समुळ उच्चाटन नक्कीच होऊ शकते.म्हणून या ” सामान्य विशेष पोलीस पथकाच्या असामान्य ” कामगीरीची सर्वांनी गखल घेणे गरजेचे आहे.या पथकाच्या ३० दिवसाच्या कारवाईतून चिरीमिरीच्या अर्थपुर्ण माध्यमातून अवैध धंदे व धंदेवाल्यांना अभय देणा-या काही पोलीस अधिकारी,कर्मचा-यांचे हातमिळवणीतले हितसंबंध तथा चेहरे उघडकीस ही आले असल्याने त्यांच्या विरुद्ध कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा हे काय कारवाई करतील ? याकडे अनेकांचे लक्ष लागले असून अवैध धंदेवाल्यांशी हितसंबंध जपणा-या काही त्या पोलीसांसह अनेक अपप्रवृत्तीचे धाबे दणानले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रध्दा वालकर प्रकरणी विशेष पोलीस पथकामार्फत चौकशी करणार; उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Aprna

लाखोंची खंडणी वसुलीप्रकरणी आरटीआय कार्यकर्तीला अटक 

swarit

मीरा भाईंदरच्या काशीमिरामधून अमली पदार्थ तस्कराकडून 19 लाखांचे मेफेड्रोन (MD) जप्त

Chetan Kirdat