मुंबई | कथित 100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) दिलासा मिळालेला आहे. देशमुखांना मिळालेल्या जामीन रद्द करण्याची सीबीआयची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांना जामीन मंजूर केला असून या निर्णयाविरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळून लावली.
उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नसल्याचे कारण देत सीबीआयने देशमुखांच्या जामीनाविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. ते सध्या तुरुंगातून बाहेर आलेले आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयाने देशमुखांना नोव्हेंबर 2022 मध्ये जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आणि देशमुखांना जामीन देखील मंजूर झाला होता. यानंतर सीबीआयने देशमुखांच्या जामीनाविरोधात याचिका दाखल केली होती. परंतु, ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.