Site icon HW News Marathi

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल

मुंबई | पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांच्या जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यावर न्यायालयात उद्या (8 सप्टेंबर) सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी ईडीने राऊतांना 31 जुलै रोजी अटक केली होती. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात 5 सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडली. यावेळी राऊतांना न्यायालयाने 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या राऊत आर्थर रोड कारागृहात मुक्कामी असून त्यांना घरचे जेवण आणि औषधे पुरवण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना राऊतांना कारागृहात भेटण्यासंदर्भात लेखी निवेदन दिले नव्हते. ठाकरेंच्या वतीने कारागृहातील प्रशासनाला फोन आला होता. यानुसार, उद्धव ठाकरेंना राऊतांना पोलीस अधीक्षकांच्या रुममध्ये भेटायचे असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, कारागृहात अधीक्षकांनी राऊतांना भेटायचे असल्याचे सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे भेट घ्यावी लागेल. यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सुत्रांनी ही माहिती दिली आहे.

 

नेमके काय आहे प्रकरण

 

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

संबंधित बातम्या

१९ सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Exit mobile version