HW News Marathi
क्राइम

कौटुंबिक वादातून चार जणांची हत्या 

कोल्हापूर कौटुंबिक वादातून चार जणांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील यड्राव या गावात धक्कादायक घटना घडली आहे. जावयाने सासू व मेहुणीच्या हत्या केली आहे. या हल्लात पत्नी व मेहुण्याला गंभीरित्या जखमी झाले होते. ही घटना घडल्यानंतर तातडीने पत्नी व मेहुण्याला सांगलीमधील सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु होते. परंतु उपचार दरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला.

शनिवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोर जावाई फरार झाला होता. मात्र आता प्रदीप विश्वनाथ जगताप (आरोपी) पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती हाती आली आहे. छाया श्रीपती धुमाळ (सासू), सोनाली अभिषेक रावळ (मेहुणी), रुपाली प्रदीप जगताप (पत्नी ), श्रीपती आयरेकर धुमाळ (मेहुणा) ही मृत व्यक्तींची नावे आहेत. हल्लेखोराने यंत्रमागाच्या लाकडी मागणे घाव घातल्याचे दिसून आले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…मग मला घाबरण्याचे कारण काय ?

News Desk

मुलींची छेड करणाऱ्या क्‍लासच्या व्यवस्थापकाला चोप

News Desk

सांगली साधू मारहाण प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना घेतले ताब्यात

Aprna