HW News Marathi
क्राइम

Koregaon Bhima Violence | पाचही आरोपींच्या नजरकैदेत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ

नवी दिल्ली | भीम-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील पाचही आरोपींच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली. या आरोपींच्या नजरकैदेत १७ सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान हा निर्णय दिला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवर राव यांना अटक केली होती. मात्र या आरोपींना अटक न करता केवळ नजनकैदेत ठेवण्याचे आदेश देत

नेमके प्रकरण काय

३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेसाठी माओवाद्यांनी पैसे पुरवल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले. यापूर्वीही एल्गार परिषदेशी संबंधित सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, महेश राऊत, रॉनी विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांनाही अटक करण्यात आली होती. याबाबत कबीर कलामंचावर देखील पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहशतवादी सलिम खानला मुंबईतून अटक

News Desk

व्यापाऱ्याच्या मुलीची प्रियकराकडून हत्या

News Desk

पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतले विष..

News Desk