Site icon HW News Marathi

संजय राऊतांची आज न्यायालयीन कोठडी संपणार; काय निर्णय येणार, याकडे सर्वांचे लक्ष

मुंबई | पत्राचाळा घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Case) शिवसेने नेते संजय राऊत  (Sanjay Raut) यांची आज ( 22 ऑगस्ट)  पीएमएलए न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी राऊतांना 8 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली होती. त्यात राऊतांना न्यायालयाने 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठीड सुनावली होती. यामुळे राऊतांच्या कोठडी वाढणार की संपणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  राऊतांचा सध्याचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहात आहे. याआधी झालेल्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान राऊतांना घरचे जेवण आणि औषधे देण्यास परवानगी दिली आहे.

 

राऊतांच्या भांडूप येथील निवासस्थानी 31 जुलै रोजी सकाळी ईडीन छापा टाकला. यानंतर राऊतांनी 9 तासांची चौकशी केल्यानंतर ईडी त्यांना ताब्यात केली. यानंतर ईडी कार्यालयात राऊतांनी 7 तासांची चौकशी केल्यानंतर ईडीने 31 जुलै रोजी मध्य रात्री अटक केली. यानंतर राऊतांना दाखल केल्यानंतर 4 ऑगस्टपर्यंत 8 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. राऊतांची आज ईडी कोठडी सुटल्यानंतर पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने 22 ऑगस्टपर्यंत राऊतांना कोठडी सुनावली असून राऊतांचा पुढील मुक्काम हा आर्थर रोड कारागृहात असणार आहे.

 

नेमके काय आहे प्रकरण

 

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

संबंधित बातम्या

संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी; पुढील मुक्काम आर्थर रोड कारागृहात

Exit mobile version