Site icon HW News Marathi

संजय राऊतांचा ‘दसरा मेळावा’ तुरुंगातच; जामीन अर्जावर 10 ऑक्टोबरला होणार सुनावणी

मुंबई | शिवसेनेचे नेते संजय राऊत  (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर 10 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. यामुळे राऊतांचा दसरा मेळावा हा तुरुंगाच जाणार असल्याचे स्पष्ट झाले. राऊतांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला आहे. यामुळे आता राऊतांच्या जामीन अर्जावरील पुढची सुनावणी ही 10 ऑक्टोबरला होणार आहे. सध्या राऊतांवर होणारी सुनावणी ही पीएमएलए न्यायालयाने तहकूब केले आहे. राऊतांच्या जामीन अर्जावर आज (27 सप्टेंबर) सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने संजय राऊतांची कोठडीत आणखी 13 दिवसांनी वाढवली आहे.

यापूर्वी राऊतांना 19 सप्टेंबरला न्यायालयात हजर केले होते. तेव्हा राऊतांची 4 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवली होती. याआधी राऊतांना 5 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने राऊतांना 19 सप्टेंबरपर्यंत सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. याआधी राऊतांना २२ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने राऊतांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

 

नेमके काय आहे प्रकरण

 

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

संबंधित बातम्या

संजय राऊतांना 4 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

 

Exit mobile version