Site icon HW News Marathi

जितेंद्र आव्हाडांच्या जामीन अर्जावर लवकरच निकाल

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या तक्रारीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर आव्हाडांवर अटक पूर्व जामिनीसाठी ठाणे सत्र न्यायालयात (Thane Sessions Court) धाव घेतली होती. आव्हडांच्या जामीन अर्जावर आज (15 नोव्हेंबर) सुनावणी पूर्ण झाली असून दुपारी 2 वाजता न्यायालय निकाल देणार आहे. न्यायालय आव्हाडांना जामीन देणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

 

आव्हाडांचे वकील गजानन चव्हाण यांनी युक्तिवाद सादर केला. आव्हाडांच्या वकीलांनी चव्हाणांनी न्यायालयात युक्तीवाद मांडताना म्हणाले, “घटनास्थळी मोठी गर्दी  होती. या गर्दीच्या ठिकाणी विनयभंग कसा होऊ शकतो?,” असे त्यांच्या वकीलांनी न्यायालयात मांडले. तसेच तक्रारदार महिलेला आव्हाडांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या कार्यक्रमात बहिण असा उल्लेख केला होता. या कार्यक्रमाचा व्हिडिओ आव्हाडांच्या वकिलांनी न्यायालयात सादर केला आहे.

 

नेमके काय आहे प्रकरण
ठाण्यातील कळवा खाडी पुलाचे रविवारी (13 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी, खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थितीत होते. या सोहळ्यादरम्यान भाजपच्या महिला पदाधिकारी मुख्यमंत्री गाडीतून जात असताना गाडीच्या डाव्या बाजूला पुढे उभी होतो. त्यावेळी आव्हाड गाडीच्या समोरुन आले असून त्या भाजपच्या महिला पदाधिकारीला आव्हाडांनी हात लावून बाजूला केले गेले. यानंतर महिलेने आव्हाडांनी चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप करत मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात तक्रारदाखल केली. या महिलेच्या तक्रारीच्या आधारे आव्हाडांवर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Exit mobile version