मुंबई । पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Case) शिवसेने नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. राऊतांची आज (५ सप्टेंबर) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. राऊतांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे न्यायालयाकडून राऊतांना दिलासा मिळाला नाही. याआधी राऊतांना २२ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने राऊतांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सध्या राऊत हे आर्थर रोड कारागृहात असून त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाल्यानंतर कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
दरम्यान, या घोटाळ्याप्रकरणी राऊतांची पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने चौकशी केली आहे. तर राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. या प्रवीण राऊत यांच्यामार्फत राऊतांनी आर्थिक गैरव्यवहार केला आहे. याप्रकरणाचा ईडी तपास करत असल्याचे सांगितले आहे. या पैशातून राऊतांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे. राऊतांच्या भांडूप येथील निवासस्थानी 31 जुलै रोजी सकाळी ईडीन छापा टाकला. यानंतर राऊतांनी 9 तासांची चौकशी केल्यानंतर ईडी त्यांना ताब्यात केली. यानंतर ईडी कार्यालयात देखील राऊतांची 7 तासांची चौकशी केल्यानंतर ईडीने 31 जुलै रोजी मध्य रात्री अटक केली.
यानंतर राऊतांना १ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले. आणि न्यायालयाने राऊतांना न्यायालयाने राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत न्यालयीन कोठडी सुनावली. यानंतर राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. राऊतांची न्यायालयीन कोठडी 8 ऑगस्टला न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने पुन्हा एकाद 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर राऊतांना आज न्यायालयात हजर केल्यानंतर पुन्हा एकदा 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नेमके काय आहे प्रकरण
मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.
संबंधित बातम्या
संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
संजय राऊतांची आज न्यायालयीन कोठडी संपणार; काय निर्णय येणार, याकडे सर्वांचे लक्ष