HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या १७ पथके तैनात

मुंबई । राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ (NDRF) व  एसडीआरएफच्या (SDRF) 17 पथके तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबई (कांजूरमार्ग – 1, घाटकोपर – 1) – 2, पालघर – 1, रायगड – महाड – 2, ठाणे – 2, रत्नागिरी -चिपळूण – 1, कोल्हापूर – 2, सातारा – 1, सांगली – 2 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण 13 पथके तैनात आहेत.

नांदेड – 1, गडचिरोली – 2, भंडारा – 1, अशा एकूण चार राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ)  पथके तैनात करण्यात आली आहेत.

राज्यातील नुकसानीबाबतची सद्यस्थिती

राज्यात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 29 जिल्हे व 351 गावे प्रभावित झाली असून 117 तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून 20 हजार 866 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे 124 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर 243 प्राणी दगावले आहेत. 44 घरांचे पूर्णत: तर 3 हजार 534 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून काल सकाळी 11 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात  येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पावसामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द 

News Desk

आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर एसएफआय करणार राज्यव्यापी आंदोलन

News Desk

अन्यथा मरेपर्यंत उपोषणाची परवानगी देण्याची आरोपीची न्यायालयाकडे मागणी

News Desk