HW News Marathi
शिक्षण

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, ३५ हजार विद्यार्थी नापास

मुंबई | मुंबई विद्यापीठाने गेल्या काही वर्षापासून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकन प्रक्रियावरून वाद निर्माण झाला आहे. कारण गतवर्षाच्या परीक्षेच्या निकालात ९७ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रिचेकिंगसाठी अर्ज दिले होते. त्यापैकी फक्त ९७ हजार ३१३ विद्यार्थ्यांनी चुकून नापास केल्याची कामगिरी मुंबई विद्यापीठाने केले असल्याची माहिती अधिकारात समोर आली आहे.

२०१४ ते २०१६ या तीन वर्षात विद्यापीठाच्या परीक्षेत सुमारे ७३ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासल्या होत्या. या मूल्यांकनाच्या गुणवत्तेवरून प्रश्न उपस्थित होते आहेत. गतवर्षीच्या उन्हाळ्याच्या परीक्षेत ४९,५९६ विद्यार्थ्यांनी आपल्या ८५,०६८ उत्तरपत्रिकांमध्ये मिळालेल्या गुणांवर शंक उपस्थित करत रिचेकिंगसाठी अर्ज केला होता. यामध्ये १६,७३९ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासल्या होता.

गेल्या वर्षी समर सेशन परीक्षेदरम्यान ४९ हजार ५९६ विद्यार्थ्यांना ८५ हजार ०६८ उत्तर पत्रिकांच्या तपासणीवर साशंकता होती. तेव्हा त्यांनी त्या उत्तर पत्रिका पुनर्मूल्यांकनाला पाठवल्या होत्या. त्यात १६ हजार ७३९ विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका चुकीच्या पद्धतीनं तपासण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले.

२०१७च्या दुस-या सत्रातही जवळपास ४७,७१७ विद्यार्थ्यांनी ७६,०८६ उत्तर पत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी पाठवल्या होत्या. ज्यात १८,२५४ विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. अशाच प्रकारे २०१६ च्या पहिल्या सत्रातही ४४,४४१ मधील जवळपास १६,९३४ विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण करण्यात आले होते. त्यामुळेच मुंबई विद्यापीठातीलपरीक्षा मूल्यांकन प्रक्रियेवरचा विद्यार्थ्यांचा विश्वास कमी होत असल्याचं आरटीआय कार्यकर्ता विहार दुर्वेने सांगितले आहे. २०१४ मध्येही जवळपास ८० हजार विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता, आता तो आकडा लाखांच्या जवळपास गेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भोकर सा.बां.वि.कार्यालयात रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी भरवली शाळा

News Desk

डिएसकेंना आता पाठ्यपुस्तकात स्थान नाही…

News Desk

रात्रशाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा

News Desk