HW News Marathi
शिक्षण

सीबीएसईचा २५ एप्रिलला बारावीचा पेपर फक्त दिल्ली आणि हरियाणात

नवी दिल्ली | केंद्रीय माध्यमिक बोर्ड (सीबीएसई) ने बारावी अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा एकादा २५ एप्रिला होणार असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी सांगितले. सीबीएसईचा दहावी आणि बारावीचा पेपर फुटला होता.

दहावीचा गणिताचा पेपर २८ मार्च तर बारावीचा २७ मार्चला घेण्यात आला होता. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी दोन्ही विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा विचार बोर्डाने घेतला आहे. दहावीच्या पेपर फुटीप्रकरणी तपास सुरू असून १५ दिवसात फेरपरीक्षा घ्यायची अथवा नाही, असे स्पष्टीकरण मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी सांगितले आहे.

तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर केवळ दिल्ली आणि हरियाणात अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा घेतला जाईल अशी माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटर करुन दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाणे महानगरपालिकेत अधिष्ठाता पदाची जागा

News Desk

मुला-मुलींसाठी विशेष योगाभ्यास वर्गाचे आयोजन

News Desk

पवई आयआयटीत चोरांचा धुमाकूळ 

News Desk