HW News Marathi
मनोरंजन

प्रेक्षकांच्या अपेक्षांचं रिंगण पूर्ण होईल

प्रेम इंगळे

आषाढीमध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीसाठी भक्त देशाच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरात दाखल होतात. वाखरीचं रिंगण म्हणजे या वारकऱ्यांचा परमोच्च आनंदाचा क्षण… या रिंगणालाच केंद्रबिंदु ठेवून एक नवा कोरा चित्रपट प्रदर्शित झालाय. हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या अपेक्षांचं रिंगण नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वास वाटतो.

रिंगण या महाराष्ट्रात करोडोंच्या संख्येनं असलेल्या सामान्य शेतकऱ्यांच्या, पर्यायानं वारकऱ्यांच्या जगण्यातील ‘केवळ रोमँटीसिजम’ मांडत आलेल्या कथित कवी, लेखक, पत्रकार, चित्रपटकर्त्यांना वास्तवाचे आक्रोशापलिकडचे भान देणारा हा सच्चा सिनेमा आहे. मरणाच्या दारात स्वत:हूनच चालत जाऊन उंबरठ्याशी क्षणभर थांबून मरणाची माफी मागून स्वत:च माघारी फिरणाऱ्या एका शेतकऱ्याचा हा सिनेमा आहे. देवाघरी गेलेल्या आईचा थेट पंढरपुरातच बापाचं बोट धरून शोध घेणाऱ्या कोवळ्या मुलाचा हा सिनेमा आहे. सामान्य ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शरीरात रक्ताइतक्याच व्यापून असलेल्या विवेकवादाचा, माणूसपणाचा, मूल्यांचा हा सिनेमा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन मकरंद माने यांनी केलंय. तर गीतलेखन दासु वैद्य यांनी केलंय.

का पाहाल हा सिनेमा ?

काळजात माणूसपण जिवंत असलेल्या प्रत्येकालाच हा सिनेमा आवडेल कारण त्यातील गाणी अत्यंत वास्तवदर्शी आहेत. त्यातल्या गाण्यांना शब्दांनी सजवलंय दा.सु.वैद्य यांनी. तसेच आदर्श शिंदेच्या आवाजानं गाण्याला एका उंचींवर नेलं आहे. कथा, दिग्दर्शन, गीत-संगीत आणि अभिनयाच्या जोरावर परिक्षकांनी या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडलं होतं. आता प्रेक्षकांच्या प्रतिसादाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यासाठी येत्या ३० जूनपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शाहरूखची बहीण पाकिस्तानमधून लढवणार निवडणूक

News Desk

बिग बींचा शेतकरी व शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

News Desk

Gandhi Jayanti : भाजपच्या पदयात्रा मोहिमेत मुख्यमंत्री सहभागी

swarit