HW News Marathi
मनोरंजन

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोल माफी

मुंबई | गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबरपर्यंत टोल माफ करण्याचा निर्णय शासनाने आज (२९ ऑगस्ट) घेतला आहे. त्यामुळे कोकणात खासगी वाहनांनी जाणाऱ्या वाहनचालकांनी पोलीस स्थानकातून टोल पास घ्यावेत, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

कोकणात जाणाऱ्या रस्त्यांच्या स्थिती संदर्भातील नुकतीच बैठक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झाली होती. या बैठकीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा, त्यासंबंधीचा शासन निर्णय आज सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केला आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबई-पुणे-कागल मार्गे कोकणात जाणाऱ्या भाविकांना एक स्टिकर पास देण्यात येणार आहेत. हा पास १२ सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासात ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच मुंबई-पुणे प्रवासात व पुणे- कोल्हापूर कागल मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई (वाशी), पुणे-मुंबई एक्सप्रेस वे, किणी तावडे येथील पथकर नाक्यांवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसेना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. याबाबतच्या सुचना सदर शासन निर्णयानुसार संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लातुरची शिक्षिका कौन बनगो करोडपतीमध्ये..

News Desk

Kargil Vijay Diwas : थोडक्यात जाणून घ्या…’कारगिल’विषयी

News Desk

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान यांचे निधन

News Desk