HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

मुख्यमंत्र्यांच्या ५ वर्षाच्या काळात सर्वात जास्त जातीय तणाव, पोलिसांचा अहवाल

मुंबई। राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. तर राज्यात जातीय तणावात वाढ झाल्याचा अहवाल पोलिसांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील जातीय तणाव वाढले असल्याच या अहवालातून समोर आले आहे. हिंदु-मुस्लिम तणावाची जागा गेल्या पाच वर्षात सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणावाने घेतली असल्याचे दिसत आहे.

मुंबईत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला होता. त्यात पोलीस खात्याने राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेसंदर्भात एक सादरीकरण केले. ज्यामध्ये राज्यातील हिंदू-मुस्लीम तणावाची जागा गेल्या पाच वर्षात सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणावाने घेतल्याचा अहवाल पोलीस खात्याने निवडणूक आयोगाला दिला. या अहवालानुसार, हिंदू-मुस्लीम धर्मियांतील तणावासाठी राज्यातील ८ जिल्हे संवेदनशील आहेत. तर त्या तुलनेत सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणाव असलेले १४ जिल्हे आहेत.

पालघर, ठाणे, पुणे, सोलापूर, अहमदनगर, बुलढाणा, वाशिम आणि औरंगाबाद हे जिल्हे मुस्लिम आणि हिंदु धर्मियातील तणावाच्या घटनांसाठी संवेदशील आहेत. तर गेल्या काही वर्षात राज्यात हिंदु-मुस्लिम तणावापेक्षा सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणाव राज्यात वाढला आहे. २०१८ मध्ये कोरेगाव-भिमा येथील हिंसाचाराने राज्यातील जातीय तणाव अधोरेखीत केला. मात्र पोलिसांच्या आकडेवारीवरुन फडणवीस सरकारच्या पाच वर्षाच्या काळात जातीय संवेदनशीलता वाढत गेल्याचे समोर येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची वाट गेल्या पाच वर्षापासून पाहत होतो!

News Desk

वंचितमध्ये फूट, जलील यांच्या घोषणेवर औवेसींचा शिक्कामोर्तब

News Desk

Vaibhav Pichad BJP | शरद पवारांचा आयुष्यभर ऋणी राहिन..

News Desk