HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

मतमोजणी तीन दिवसानंतर का? भुजबळांचा सवाल

नाशिक | निवडणूक आयोगने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज (२१ सप्टेंबर) घोषणा झाली आहे. निवडणुकी आयोगाने दिलेल्या माहितीनुसार २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. यानतंर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते मतदान आणि मतमोजणीच्या तारखांमधील तफावतीवर आक्षेप घेतला आहे. विधानसभेचे मतदान ईव्हीएम मशीनने होत आहे. मग मतमोजणी तीन दिवसानंतर का? दुसऱ्या दिवशीच मतमोजणी का नाही? असा सवाल करतानाच ईव्हीएममध्ये गडबड करण्यासाठी सरकारने दोन दिवस घेतले आहेत का? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे.

दरम्यान ईव्हीएमवरून विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. मात्र, विधानसभा निवडणुका या बॅलेटपेपरवर घ्याव्यात, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने विरोधकांच्या मागणीला दुजोरा न देता निवडणूक ईव्हीएमवर होणार असल्याचे जाहीर केले. यामुळे पुन्हा ईव्हीएम प्रश्न उपस्थि केले आहेत. ईव्हीएममध्ये गडबड करायची तर नाही ना? अशी शंका कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

असा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

२७ सप्टेंबर – निवडणुकीची अधिसूचना जारी होणार

४ ऑक्टोबर – उमेदवारी अर्जासाठी मुदत

५ ऑक्टोबर – उमेदवारी अर्जांची छाननी

७ ऑक्टोबर – अर्ज मागे घेण्याची मुदत

२१ ऑक्टोबर – मतदान

२४ ऑक्टोबर – मतमोजणी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची वाट गेल्या पाच वर्षापासून पाहत होतो!

News Desk

शरद पवारांनी जो सन्मान दिला तितका भाजपच्या सात पिढ्यासुद्धा देणार नाही !

News Desk

 काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

News Desk