HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जमाफीऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करा – आ. प्रशांत बंब यांची मागणी  

मुंबई – भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या मागणीने बुधवारी विधानसभेत मोठा गदारोळ झाला. सभागृहात बोलत असताना प्रशांत बंब यांनी म्हटले की, माझं स्पष्ट म्हणणं आहे की कर्जमाफी अजिबात होऊ नये. त्याऐवजी त्यांच्या खात्यावर पैसे जमा करा. प्रशांत बंब यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी प्रशांत बंब यांनी पुढे काहीच बोलून दिले नाही. त्यामुळे प्रशांत बंबही चांगलेच संतापलेले दिसले. आपल्याला बोलू द्यावे, अशी मागणी सातत्याने ते विधानसभा अध्यक्षांकडे करत होते. मात्र, या सगळ्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. अखेर भाजपचे काही आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न केला.

उत्तर प्रदेशच्या सरकारने शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जे माफ करून फडणवीस सरकारने अधिवेशनातच आम्हाला त्यांचे अभिनंदन करण्याची संधी द्यावी, असे शिवसेनेचे आमदार शंभुराजे देसाई यांनी सांगितले. तर दुसरीकडे विधानपरिषदेत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना प्रत्येक शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी सरकारवर ३०२ कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याची भाषा करायचे. मग आता नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर सरकारवर ३०२ कलमातंर्गत नऊ हजार खटले दाखल करायचे का, असा सवाल राणे यांनी विचारला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मला कोरोना ईडीची तारीख पाहून झाला नाही, खडसेंवर गिरीश महाजनांची बोचरी टीका

News Desk

विकासकामे करून दाखवणारे सरकार! – उद्धव ठाकरे

Aprna

सगळ्यांनी फिल्डवर जायची गरज नसते, शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण

News Desk