HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करा

पैठण: शेतकरी संपानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीची रक्कम बँकेत जमा होईपर्यंत शेतक-यांना तातडीची मदत म्हणून हजार रूपय पीक कर्ज देण्याची घोषणाही करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात ते दिलेच नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा; अशी तक्रार औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण एमआयडीसी पोलिसात एका शेतक-याने दिली. पैठण तालुक्यातील वाहेगाव येथील संतोष सखाराम सोनवणे या शेतकºयांकडे दोन एक्कर शेतजमीन आहे. एसबीआयच्या ईसारवाडी शाखेतून त्यांनी कर्ज घेतले होते. कर्जमाफीची घोषणा झाल्याने नवीन कर्ज घेता येईल. त्यातून शेतीची कामे करता येतील, असे त्यांना वाटले. मात्र तत्वत: आणि निकष शब्दांमुळे बँका दारात उभे करत नसल्याचा अनुभव त्यांना आला. शिवाय निर्णयाची अंमलबजावणी होईपर्यंत दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र त्याची पूर्तता झाली नाही. पत्नीचे दागिने गहाण ठेऊन पेरणी करण्याची वेळ आली, असे सोनवणे म्हटले आहे.

निसर्ग साथ देत नाही. सरकार घोषणा करून त्याची अंमलबजावणी न करून शेतकºयांची फसवणूक करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: घोषणा केली. मात्र दोन महिने होत आले तरी शेतकºयांना त्याचा फायदा झालेला नाही. ही एक प्रकारे शेतकºयांची फसवणूक असल्यानं त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी तक्रार एमआयडीसी पोलिसात त्या शेतक-याने दिली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या नगरसेवकांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

Aprna

कोणत्याही शासकीय शाळेतील वीजपुरवठा खंडित होणार नाही! – दीपक केसरकर

Aprna

पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये दिले!

News Desk