HW News Marathi
महाराष्ट्र

विरोधक कुठे आहेत?विरोधक तर बिहार मध्ये आहेत! महाराष्ट्राच्या संकटाच्या काळात शरद पवार धावून येतात–धनंजय मुंडे

बीड | बीड जिल्ह्यात पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असून त्याची पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे हे बांधा बांधावर जाऊन पाहणी करत आहेत, त्याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा ही आज उस्मानाबाद, लातूर दौरा सुरू आहे. राज्यावर आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी पुर्ण हवालदिल झाला आहे. मुख्यमंत्री आणि महाविकासआघाडीचे सर्वच पालकमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान पाहणी करण्यासाठी बांधा बांधावर जात आहेत.

या अनुषंगाने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे. ते म्हणाले की, ‘सध्या विरोधक महाराष्ट्रात कुठे आहेत? ते तर बिहार मध्ये आहेत .जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट येतात तेव्हा तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शरदचंद्र पवार मदतीला धावून येतात. मग ते सत्तेत असो अथवा नसो ‘ असे पालकमंत्री धनंजय मुंडे या वेळी बोलतांना म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा, संभाजीराजे पुढाकार घ्या, प्रकाश आंबेडकरांनी थोपटली पाठ!

News Desk

उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात आता फरकच उरलेला नाही नितेश राणे यांची टीका!

News Desk

गर्भवती, दुर्धर आजार असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा द्यावी

News Desk