HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना फक्त 4 टक्के व्याजदरानं पीककर्ज

नवी दिल्ली – नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सवलत देत कमी दरात पीककर्ज देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळं देशभरातील शेतकऱ्यांना पीककर्जातून थोडासा दिलासा मिळणार आहे. आजवर शेतकऱ्यांना 9 टक्के व्याजदरानं पीककर्ज दिलं जात होतं, त्यापैकी पाच टक्के व्याजदरात आता सरकार सवलती देणार आहे, त्यामुळं शेतकऱ्यांना प्रत्यक्षात 4 टक्के व्याजदरानं पीककर्ज उपलब्ध होणार आहे.

देशातील शेतकऱ्यांना आता पीककर्जावर 2 टक्के अनुदान आणि वेळेवर कर्ज भरल्यास 3 टक्के सवलत, अशी एकूण पाच टक्के रक्कम सरकार भरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के दराने कर्ज उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना पीककर्ज 9 टक्के दराने दिलं जातं. मुद्दल रक्कमेपेक्षा व्याजाचं ओझंच जास्त झाल्याने कर्जाची रक्कम वाढत जाते. मात्र एका वर्षासाठी घेतलेलं कर्ज कमी दरात देण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनासाठी सरकारच्या तिजोरीवर 19 हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

पीक कर्जावरील 5 टक्के रक्कम सरकार देणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना 9 टक्के व्याजाने मिळणारं कर्ज आता 4 टक्के व्याजदरानं मिळणार आहे. एका वर्षासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. जास्तीत जास्त 3 लाख रुपये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमुळं सरकारच्या तिजोरीवर भार पडणार असल्यानं सरकारनं चालू आर्थिक वर्षासाठी 20 हजार 339 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप-शिवसेनेकडून सत्तेचा दुरुपयोग | शरद पवार

News Desk

मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या हाकणे बंद करावे !

News Desk

महाराष्ट्र हे आरोग्य पर्यटन क्षेत्रात पसंतीचे राज्य! – मंगल प्रभात लोढा

Aprna