HW News Marathi
महाराष्ट्र

साप चावून मेले ८७७ विद्यार्थी

नागपूर : राज्यभरातील विविध आश्रमशाळांमधील ८७७ विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. आश्रमशाळांची पाहणीसाठी नेमण्यात आलेल्या दोन समित्यांनी २००१ ते २०१४ या १४ वर्षांतील परिस्थिती अभ्यासून दिलेल्या अहवालातून अशा अनेक धक्कादायक बाबी निष्पन्न झाल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यातील कुपटी गावच्या आश्रमशाळेतील अंजली मेंढे या मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेने आश्रमशाळांमधील सुरक्षेचा व व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ साली एका याचिकेवर सुनावणी करताना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या माध्यमातून समिती गठित केली होती. दुसरीकडे राज्यपालांनीही आश्रमशाळांच्या चौकशीसाठी डॉ. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. या दोन्ही समित्यांनी दिलेल्या अहवालानुसार आश्रमशाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या ८७७ मुला-मुलींचा गेल्या चौदा वर्षांत सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. म्हणजेच वर्षाला ७० ते ७५ मुले सर्पदंशाचे बळी ठरले. यापैकी ४५३ मुलांच्या पालकांना नुकसानभरपाई म्हणून मोबदला देण्यात आला आहे. अहवालामध्ये २०१५ पासूनची माहिती नमूद करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, ४५ टक्के प्रकरणांमध्ये आश्रमशाळा चालकांकडून मृत्युचे खरे कारण लपविले जात असल्याचे समितीला दिसून आले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या १०५ आमदारांमध्ये शिवसेनेचं योगदान मोठं, शिवसेनेशिवाय भाजपचे ४०-५० आमदार असते…

News Desk

तरुणाची हत्या करणारे ते अखेर पोलिस निलंबित

News Desk

“तौक्ते वादळही 4 तास थांबलं, मुख्यमंत्री 3 तासही थांबले नाही”

News Desk