HW News Marathi
महाराष्ट्र

अहमदनगरच्या पतपेढीमध्ये सुमारे 900 कोटी रूपयांचा गैरव्यवहार ?

मुंबई – राज्यात सहकार संस्कृती रूजवण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या अहमदनगरमधील ज्ञानेश्वरी मल्टी स्टेट अर्बन सहकारी पतपेढीमध्ये सुमारे 900 कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. फेब्रुवारी २०१५ ते मार्च २०१७ या कालावधीत हा गैरव्यवहार झाला असून यात कर बुडवण्यात आल्याचा संशय आहे.

ज्ञानेश्वरी मल्टी स्टेट अर्बन सहकारी पतपेढी असून ही पतपेढी २०१३ मध्ये सुरु करण्यात आली होती. या पतपेढीच्या मुंबई आणि मध्य प्रदेशमधील इंदौरमध्येही शाखा आहेत. या पतपेढीमधून गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात संशयास्पद व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. पतपेढीमधील व्यवहारांचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पतपेढीमधील ५८ जणांचा खात्यांमध्ये पैशे जमा झाले. पण ही खाती बोगस असावी असा दाट संशय आहे. बोगस व्यक्ती किंवा कंपनीच्या नावे खाते उघडून हे व्यवहार केले असावेत असे सूत्रांचे म्हणणे आहे.

आयकर विभागाने पतपेढीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी आणि शाखांमध्ये छापे टाकले असून या छाप्यांमध्ये काही कागदपत्रही हाती लागली आहेत. यातून पतपेढीमध्ये काळ्या पैशांचे व्यवहार झाल्याचा दाट संशय येतो असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मनोरंजन, ज्वेलरी अशा विविध क्षेत्रातील मंडळी आणि कंपनींचा यात सहभाग असू शकतो असे संबंधीत अधिकाऱ्याने आवर्जून सांगितले. या संदर्भात पतपेढीच्या प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेमडेसिविर साठा करणारा भाजपचा ‘तो’ माजी आमदार गोत्यात, नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

News Desk

पत्री पुलाचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही, मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

News Desk

अॅड. गुणरत्न सदावर्तेंची जामीनावर सुटका; तब्बल 18 दिवसांनी तुरुंगातून बाहेर

Aprna