HW News Marathi
महाराष्ट्र

आ. प्रशांत परिचारक यांनी घेतला सैनिक पत्नीच्या चारित्र्यावर आक्षेप…

सैनिक पत्नी बाहेरख्याली

पंढरपूर : नवरा देशाचे संरक्षण करीत असताना त्याच्या पश्चात त्याची पत्नी बाळाला जन्म देते असे संतापजनक वक्तव्य आ. प्रशांत परिचारक यांनी केल्याने त्यांच्या राजकीय विरोधकांनी परिचारकांना चांगलेच अडचणीत आणले आहे. आपल्या जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिक पत्नीच्या चारित्र्यावर आ. परिचारक यांनी थेट आक्षेप घेतल्याने सोशल मीडियातूनही या वक्तव्याचा तीव्र निषेध केला जात आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार निमित्ताने भोसे गावात आ. परिचारक यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थिती एक नेत्याने उजनीचे पाणी कोणी सोडले यावरून श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित केला. राष्ट्रवादी दावा करते आम्ही आंदोलन केले म्हणून शेतीसाठी पाणी सोडले भाजपावाले म्हणतात आम्ही सत्तेत आहोत आम्ही सांगितले म्हणून पाणी सुटले.

श्रेयवादाचा हाच मुद्दा पकडून उदाहरण देताना आ. परिचारक थेट सैनिक पत्नीच्या चारित्र्यावर घसरले. आपल्या जाहीर भाषणात ते म्हणाले, सैनिक वर्षभर देशाच्या सीमेचे संरक्षण करीत असतो. एक दिवस त्याला तार येते. मुलगा झाला म्हणून, या आनंदाच्या बातमीने जवान पेढे वाटतो. तेंव्हा त्याचा सहकारी सैनिक त्याला विचारतो तू तर वर्षभर घराकडे गेला नाही. मग तुला मुलगा कसा काय झाला.

आ. परिचारक यांच्या या निर्लज्ज वक्तव्यावर त्याच्या चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला मात्र आपण श्रेय लाटण्यासाठी एक जवानांच्या पत्नीचा किती घोर अपमान आणि तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवीत आहोत याचे भान या आ. परिचारक यांना राहिले नाही.

आ. परिचारक याच्या या संतापजनक वक्तव्याचा सर्वस्तरातून आणि सोशल मीडियातून तीव्र निषेध व्यक्त होतो आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Vidhansabha2019 : कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष

News Desk

केंद्र सरकारने इंपिरिकल डेटा न दिल्याने महाराष्ट्रासोबत देशातील अन्य राज्यांमधील ओबीसींचे आरक्षण अडचणीत! – छगन भुजबळ

Aprna

“…तर महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी पेटवायचा ‘तो’डाव होता”- यशोमती ठाकूर

News Desk