HW News Marathi
महाराष्ट्र

उल्हासनगरात नागरिकांच्या तक्रारी निवारणाचा मार्ग झाला सोपा

 

गौतम वाघ

उल्हासनगर – नागरिकांना समस्या किंबहुना तक्रारी निवारणासाठी पालिकेत येण्याची गरज भासणार नाही.प्रत्येक प्रभाग निहाय साहाय्यक आयुक्तांना तक्रारी निवारणाचे विशेष अधिकार आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिल्यामुळे यापुढे नागरिकांच्या तक्रारी निवारणाचा मार्ग सोपा होणार आहे. आठवडयाच्या दर मंगळवारी आयुक्तांना भेटण्यासाठी नागरिक मोठया संख्येने येतात.ते त्यांच्या परिसरातील,आजूबाजूच्या समस्या घेऊन रडगाणे मांडतात.त्यात नाले,गटारी,पाण्याच्या लाईन,आदी किरकोळ समस्यांचा समावेश असतो.ह्या समस्या त्या हद्दीत असलेल्या साहाय्यक आयुक्त कार्यालया मार्फत सोडवता येऊ शकतात.मात्र याविषयी नागरिक अनभीज्ञ असल्याने त्यांच्यावर खिशाला आर्थिक झळ सोसून पालिकेत येण्याची वेळ येते.यावर निंबाळकर यांनी लक्ष वेधले.

उल्हासनगरात प्रभाग निहाय चार प्रभाग समिती कार्यालये आहेत.त्यात गणेश शिंपी,अजित गोवारी,नंदलाल समतानी,भगवान कुमावत हे सहाय्यक आयुक्त आहेत.यापुढे आठवडयाचा दर सोमवार सहाय्यक आयुक्त नागरिकांच्या तक्रारी निवारणा साठी देणार आहेत.तसे अर्ज नागरिकांना प्रभाग समितीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करणारा हा मॅसेज बहुतांश वॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करण्यात आला आहे.ज्यांना हा मॅसेज मिळालाय त्यांनी तो इतर ग्रुपवर पाठवावा.ज्या नागरिकांच्या तक्रारींचे निवारण सहाय्यक आयुक्तां कडून झाले नसल्यास मंगळवारी त्यांनी पालिका मुख्यालयात यावे.असे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले,
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंच्या ‘या’ मागणीला आनंद महिंद्रांनी दर्शवला पाठिंबा

News Desk

“अजित पवार मीडियाने तुम्हाला डोक्यावर घेतलं तरी महाराष्ट्राची जनता तुम्हाला आपटणार”, निलेश राणेंचा प्रहार

News Desk

उदयनराजे भोसले यांनी ‘या’ कारणामुळे घेतली थेट शरद पवारांची भेट!

News Desk