HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा पाच दिवसांपासून पाण्याखाली

 

कोल्हापूर: कोल्हापूर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक गावे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख तेरा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून कोल्हापूर-सिंधुदुर्ग मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

कोल्हापूरातील पंचगंगा नदीन धोक्याची पातळी गाठल्याची माहिती आहे. तर गगनबावडा-कळे मार्गावर पाणी साचल्याने त्या मार्गावर पाच खाजगी बसेस अडकल्याचं सांगितलं जात आहे. रात्रीपासून इथे काही बसेसमध्ये अनेक प्रवासी असल्याची माहिती मिळते आहे. हे सगळे प्रवासी सध्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.

इतकेच नाहीतर पावसाचा तडाखा इतका मोठा आहे की,129 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फुटापर्यंत पोहचली आहे. जर पंचगंगा नदीची पाणीपातळी आणखी 7 इंचाने वाढली तर कोल्हापुरात महापूर येण्याची भीती वर्तविली जाते आहे. दरम्यान, शुक्रवारी देखील जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावून जनतेला वेठीस धरले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक: यवतमाळमध्ये आश्रमशाळेत शिकणा-या 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून हत्या

News Desk

केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सीजन तुटवड्याला कारणीभूत – पृथ्वीराज चव्हाण

News Desk

पाण्याच्या वाढत्या मागणीनुसार मुळशी टप्पा क्रमांक दोनच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी! – अजित पवार

News Desk