HW News Marathi
महाराष्ट्र

गटारीपूर्वीच बोकडांवर अत्यंसंस्कार

अहमनगर: गटारी जवळ आल्याने बोकडं फस्त करण्याची खवय्याची चढाओढ सुरू असताना नगर जिल्ह्यात मात्र बोकडांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. एरवी देवाला सोडलेले बोकड विकले अथवा कापले जातात. मात्र संगमनेर तालुक्यातील करूले येथे गहिनीनाथ महाराज देवाला सोडलेल्या बोकडाचा अकाली मृत्यू झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करीत प्राणीमात्राविषयी असलेले प्रेम व्यक्त केले.

संगमनेर तालुक्यातील करुले गावातील ज्ञानदेव आहेर यांनी ग्रामदैवत गहिनीनाथ महाराजांच्या यात्रेच्या दिवशी चार वषार्चा असताना बोकड देवाला सोडला होता, मात्र विषबाधा झाल्याने बोकड बेशुद्ध पडला. त्याच्या तोंडातून अचानक फेस येत असल्याचे गावातील सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब आहेर यांनी पाहिले. त्यानंतर त्यांचे बंधू सोमनाथ आहेर यांनी तात्काळ पशुवैद्यकीय केंद्राचे डॉ. थोरात यांना बोलविले. मात्र डॉक्टर येईपर्यंत बोकडाची प्राणज्योत मालवली होती. त्यानंतर अण्णासाहेब आहेर, सोमनाथ आहेर, कादरभाई पठाण, किशोर बर्डे व गणेश मोरे या तरुणांनी एकत्र येत बोकडाचा दफनविधी केला. ग्रामदैवत गहिनीनाथ महाराजांच्या मंदिराजवळ खडडा खोदून अंत्यविधी करून प्राणीमात्राविषयी असलेले प्रेम व्यक्त केले. या बोकडाचा ग्रामस्थांना चांगलाच लळा लागला होता. आता त्याच्या मृत्यूने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

असे गुन्हेगार जिवंत का आहेत? साकिनाका बलात्कार प्रकरणावर अमृता फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया!

News Desk

एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी आज हजर राहणार

News Desk

शिरीष कुलकर्णी यांनी पोलिसांना शरण यावे | मुंबई हायकोर्ट

News Desk