HW News Marathi
महाराष्ट्र

गोहत्याबंदीबाबत फेरविचार शक्य – माधव भांडारी

सोलापूर :- ईशान्य भारतातील राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी बाबत आम्ही कधीचं आग्रही भूमिका घेतली नाही . ईशान्य भारत हा अपवाद राहिला आहे. देशातील ज्या भागात गोमांस हे रोजच्या आहारातील प्रमुख घटक आहे तेथे गोवंश हत्याबंदी कायद्यावर सरकार सहानभूतिपूर्वक फेरविचार शकते. असा नवा खुलासा भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलाय . पंढरपूर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशातील काही भागात बीफ वरून वादंग उठले असताना भंडारी यांच्या या विधानाला विशेष महत्व प्राप्त झालाय .
पुढे बोलताना भंडारी म्हणाले , केरळ , पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये गोहत्याबंदीला धर्माशी जोडले जाऊन पाशवी आंदोलने सुरु आहेत . रस्त्यावर मुक्या जनावरांची कत्तल करून निषेध केला जातोय हे अमानवी असल्याचे सांगत त्यांनी अशा घटनांचा तीव्र शब्दात निषेध केला .
काँग्रेस राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा हे ढोंग होते . मात्र शेतकरी चळवळीतील आमदार बच्चू कडू आणि खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून उपायोजना करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगिलते . राज्यात १ जून पासून संपावर जाण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला नसून त्यांच्या अडून हे राजकारण केलं जातंय. असे संप म्हणजे राज्यात अराजक पेरण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. वेळेत पेरण्या नाही झाल्यातर त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसणार आहे . सरकार धान्य आयात करुन धान्य तुटवडा भरुन काढेल . यामध्ये त्यांचेच नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांनी संप न करण्याचे आवाहन त्यांनी केलंय .
सरसकट शेतमाल कोणतेच सरकार खरेदी करू शकत नाही . फक्त मालाच्या हमीभावाची जबाबदारी सरकारची असते . तरी सुद्धा यावर्षी आपल्या सरकारने कधी नव्हे ते जवळपास ४०% शेतमाल खरेदी केलाय. १५ मार्च पर्यंत सुरु राहणारी खरेदी आम्ही ३१ पर्यंत सुरु ठेवलीय त्यामुळे शेतकऱ्यांचा एक कण माल शिल्लक राहणार नाही असे त्यांनी स्पष्ट केलंय . शेतकरी कर्जमाफी बद्दल राज्याचे मुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय देतील असे त्यांनी जाहीर केले .
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा!

News Desk

अहिल्याबाई होळकर जयंतीसाठीची परवानगी शासनाने प्रलंबित ठेवल्याने पडळकरांची टीका

News Desk

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही! – उपमुख्यमंत्री

Aprna