HW News Marathi
महाराष्ट्र

डाळींवरील साठवणुक मर्यादा हटवणार – रामविलास पासवान

नवी दिल्ली – सर्वसामान्यांसाठी दिलासा घेणारा निर्णय केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी घेतला आहे. सर्वप्रकारच्या डाळींवरच्या साठवणुकीच्या मर्यादा हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रानं सर्व राज्य सरकारलाही यासंबंधी सूचना दिल्या आहेत. मात्र, साठवणूक निर्बंध मर्यादा हटवल्यानं डाळीचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी या निर्णयाची माहिती ट्विटरवरुन दिली. ‘देशात मोठ्या प्रमाणात डाळींचं उत्पादन झालं असून सध्या डाळींना योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी डाळींच्या साठवणुकीवर लावण्यात आलेली मर्यादा तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात येत आहेत. तसेच सर्व राज्यांनाही त्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.’ असं पासवान यांनी स्पष्ट केलं.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाहून गेलेल्या,पिता-पुत्राचा मृतदेह कर्जतच्या आषाणे धबधब्याच्या नाल्यात सापडला

News Desk

कल्याणमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारा; राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

वादग्रस्त बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांची बदली!

Aprna