HW News Marathi
देश / विदेश

“…तोपर्यंत चीनसमोर झुकावे लागणार” – मोहन भागवत यांचं मोठं विधान

देशभरात 75 स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. अनेक नेत्यांनी विविध ठिकाणी जाऊन ध्वजारोहन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मुंबईमधील आयईएस राजा शिवाजी शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहन केले. यावेळी भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याबद्दल भाष्य केले आहे.’आपण इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करतो ते भारतातून येत नाही. त्यामुळे आपण शेजारी राष्ट्र चीनबाबत कितीही ओरडलो तरी आपल्या फोनमधील ज्या वस्तू आहेत त्या चीनमधून येतात. जोपर्यंत चीनवर अवलंबुन राहणे कमी होणार नाही तोपर्यंत चीनसमोर झुकावे लागणार असल्याचं मोहन भागवत म्हणाले.

आपल्या देश परकीयांच्या हाती होता तो आपला झाला…

सिकंदरने आक्रमण करण्यापुर्वी भारतात आक्रमण करणाऱ्यांचा रांगा लागल्या होत्या. मात्र आपण त्याला 15 ऑगस्टला त्याला पुर्णविराम दिला. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला आपला देश मिळाल्याचं मोहन भागवत म्हणाले. दरम्यान, आपल्या देश परकीयांच्या हाती होता तो आपला झाला आणि आपण आपलं जीवन चालवण्यासाठी आपण मुक्त झाल्याचं भागवत यांनी सांगितलं.

75 व्या स्वातंत्र्यदिनी आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करत आहेत. लाल किल्ल्यावरून मोदी म्हणाले, ’75 व्या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला आणि भारतावर प्रेम करणाऱ्या आणि जगातील लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना अनेक शुभेच्छा.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा

News Desk

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी!

News Desk

‘फरार’ विजय माल्ल्या

News Desk