HW News Marathi
महाराष्ट्र

‘ त्या ‘ शेतक-याला ५ लाखाची मदत

उत्तम बाबळे
नांदेड :- भोकर तालुक्यातील दिवशी (बु.)येथील मागासवर्गीय अल्पभूधारक मयत शेतकरी रामा लक्ष्मण पोतरे (३५) यांचे किनी येथे पीक विमा योजनेंतर्गत अर्ज भरत असतांना शनिवार, २९ जुलै रोजी दुर्दैवी निधन झाले. या घटनेस जबाबदार असणा-यांवर पोलीसांत गुन्हा नोंदवावा व मयताच्या कुटूंबीयांस तात्काळ मदत करावी असा पावित्रा सामाजिक कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी घेतल्याने नांदेड जिल्हा प्रशासनाने सुत्रे हलवली तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्याने त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मयत शेतकरी रामा पोतरे यांच्या वारसांना ५ लाख रुपये देण्याची ३० जुलै रोजी दुपारी घोषणा केली आहे. तर माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यानी भोकर येथे येऊन नातेवाईकांचे सांत्वन केले व काँग्रेस पक्षाच्या वतीने ५० हजार रुपयाची मदत दिली आहे.

मयत रामा पोतरे यांना पत्नी सुनिता पोतरे, नऊ वर्षाचे आवळे-जावळे मुलगा चि. गौरव व मुलगी कु. गंगोत्री, वडील लक्ष्मण पोतरे (७०) व आई श्रीमती सावित्रीबाई पोतरे (६०) हे वारस आहेत.रामा पोतरे हेच कुटूंबातील कर्ते होते व पीक विमा भरण्याच्या चुकीच्या नियोजनाचा हा शेतकरी बळी ठरल्याने या यंत्रणेतील दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवावा, कुटूंबीयांना तात्काळ मदत करावी आणि हे होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा मृताचे नातेवाईक,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तम बाबळे,केरबाजी देवकांबळे,माधव वाघमारे कुष्णूरकर,गणपत सुर्वेस्कर,,जोगळेकर खरबीकर यांसह आदींनी घेतला. २१ तास मृतदेह शासकिय रुग्णालयात राहीला.या दरम्यानच्या काळात भोकर उपविभागीय अधिकारी दीपाली मोतीयेळे,उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके,तहसिलदार व्यंकटेश मुंडे,पो.नि.संदिपान शेळके,आदींनी पोलीस व प्रशासन स्तरावर हालचाली केल्या. या अनुषंगाने नांदेड जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी संपर्क केला. तसेच शिवसेना भोकर ता.प्रमख सतिश देशमुख यांनी आ.हेमंत पाटील यांच्याशी संपर्क करुन भोकर येथे २९ जुलै रोजी रात्री मयताच्या नातेवाईकांशी भेट करुन दिली.यानंतर त्यांनी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांना संपर्क करुन घटनेची माहिती दिली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ना.अर्जुन खोतकर यांनी मयत रामा पोतरे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.अर्जुन खोतकर व जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा केली.या प्रयत्नातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जुलै रोजी राज्याच्या सचिवस्तर माध्यमातून मयत रामा पोतरे यांच्या कुटूंबीयांना ५ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याची घोषणा केली आहे.

खा.अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षा तर्फे दिली ५० हजाराची मदत ३० जुलै रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्ष पदाधीकारी व कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह मयत शेतकरी रामा पोतरे यांच्या कुटूंबीयांची भेट घेतली व आस्थेवाईकपणे चाैकशी करुन सांत्वन केले आणि पक्षाच्या वतीने मयताच्या कुटूंबीयांस ५० हजार रुपयाची आर्थीक मदत केली. तसेच पोसीस व प्रशासनाचे अधिकारी प्रतिनिधी व मयताच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संपादक उत्तम बाबळे,मयताचा चुलत भाऊ तथा तक्रारदार गंगाधर पोतरे,गणपत सुर्वेस्कर,जोगळेकर यांच्याशी मध्यस्थीची भूमीका बजावत चर्चा केली व शासनाच्या चुकीच्या नियोजनाचा हा शेतकरी बळी असल्याचे सांगीतले.यावेळी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष सभापती जगदीश पाटील,सरपंच राजू पाटील दिवशीकर यांची उपस्थीती होती. चर्चेअंती या घटनेची नोंद घेण्याचे ठरले व पोलीसांनी चाैकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे अश्वासन दिले .यानंतर शवविच्छेदन प्रक्रीया पार पडली.यानंतर मयत रामा पोतरे यांच्यावर गावी माै.दिवशी (बु.)येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत शेतक-याच्या कुटूंबीयांना न्याय मिळावा यासाठी सुभाष पा.किन्हाळकर,रा.काँ.पार्टीचे जिल्हा संघटक जवाजोद्दीन बरबडेकर,जिल्हा उपाध्यक्ष डाॅ.फेरोज ईनामदार,उपनगराध्यक्ष गोविंद पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट’, ओबीसी आरक्षणावरून राज ठाकरे संतप्त!

News Desk

राजू शेट्टी यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झालीये, शेलारांची टिका 

News Desk

मुंबईहून मांडव्याच्या दिशेने जाणारी बोट समुद्रात उलटली, ८८ प्रवाशांना वाचवण्यात यश

swarit