HW News Marathi
महाराष्ट्र

नववी-दहावीत आता तोंडी परीक्षा नाही  

मुंबई : दहावी गुणांचा टक्का यंदा भलताच वाढला होता. शाळांकडून वाटली जाणारी तोंडी परीक्षेच्या गुणांची खैरात, क्रीडा गुण आदीमुळे अनेक विद्यार्थ्यांना १०० टक्केही गुण मिळाले होते. ही खैरात थांबविण्यासाठी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे भाषा विषयांसाठीची २० मार्कांची तोंडी आणि ८० मार्कांची लेखी परीक्षा हा नियम बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने गुरुवारी जाहीर केला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या या निर्णयामुळे यंदा नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांची १०० मार्कांची प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे. दरम्यान, हे बदल यंदा फक्त नववीसाठी असून याची दक्षता शाळांनी घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाचा हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षांपासून दहावीसाठीही लागू होणार आहे. राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पुण्यात पार पडली होती. त्या बैठकीत परीक्षा पॅटर्न बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार!

News Desk

कधी कधी काही माणसं जास्तच बोलतात-महेश तपासे

News Desk

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला… शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ !

Adil