HW News Marathi
महाराष्ट्र

बँकांची कामे उरका; चार दिवस बँका बंद

नाशिक : ज्यांची बँकांची कामे रखडली आहेत, त्यांनी लवकरात लवकर ती उरकून घ्या. पुढच्या आठवड्यातल्या सलग सुट्यांमुळे तब्बल चार दिवस बँका बंद राहणार आहेत. एका दिवसाच्या कामकाजानंतर पुन्हा सुटी मिळणार असल्याने पुढचा पूर्ण आठवडाचबँकांचे व्यवहार ठप्प राहण्याची शक्यता आहे.

१२ ऑगस्टला दुसरा शनिवार, १३ ला रविवार, १४ ला गोकुळाष्टमी व १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असे चार दिवस बॅँकांचे कामकाज बंद असणार आहे. त्यामुळे बुधवारपासूनच अनेकांनी बॅँकिंग व्यवहार पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. १६ ऑगस्टलाकामकाजाचा दिवस आणि १७ ऑगस्टला पुन्हा पतेतीची सुटी आहे. त्यामुळे एक दिवस दांडी मारून बरेच जण सलग आठवड्याची सुटी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यातच चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातदेखील २५ ते २७ सलग तीन दिवस बॅँका बंद राहणार आहेत. २५ रोजी गणेश चतुर्थी, २६ रोजी चौथा शनिवार व २७ ला रविवार आहे. बॅँकांच्या या सलग सुट्यांमुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लसींचा ‘तो’ साठा भारतासाठीच वापरला असता तर आज ही वेळ ओढावली नसती!

News Desk

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंड मध्ये परत जाणार?

News Desk

अवैध गर्भपात करणाऱ्या डॉ.सुदाम मुंडेला आणखी एका गुन्ह्यात शिक्षा!

Aprna