HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री महोदय आम्हाला काहीही वाईट बोला; पण शेतक-यांना कर्जमाफी द्याः खा. अशोक चव्हाण

मुंबई राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संघर्ष यात्रेबद्दल बोलताना विरोधकांना कोडगे आणि निर्लज्ज असे शब्द वापरले या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संबोधून आपण आम्हाला या ही पेक्षा अधिक बरे वाईट बोला पण संकटात असलेल्या राज्यातील शेतक-याला कर्जमाफी द्या असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना खा. चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात विरोधकांचा सन्मान राखण्याची प्रगल्भ लोकशाही परंपरा आहे. या अगोदर गेल्या 57 वर्षाच्या राज्याच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्याने विरोधकांकरिता अशा भाषेचा वापर केलेला नाही. असे असतानाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असे शब्द वापरून आनंद मिळत असेल तर त्यांच्याकडून या ही पेक्षा वाईट शब्द ऐकण्याची आमची तयारी आहे. राज्यातील शेतक-यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. गेल्या अडीच वर्षात साडे नऊ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. एकाही शेतमालाला हमीभाव मिळत नाही. राज्यात तूर उत्पादक शेतकरी गेल्या कित्येक दिवसापासून घर-दार आणि लेकर-बाळं उघड्यावर सोडून खरेदी केंद्राबाहेर रांगेत उभा आहे. त्याने तूर भरून आणलेल्या ट्रॅक्टर आणि टेम्पोचे भाड़े तूर विकल्यावर त्याला मिळणा-या रकमेइतक होऊ लागले आहे. राज्यात शेतक-यांची इतकी वाईट परिस्थिती असल्याने आपल्या पक्षाच्या सरकारने उत्तर प्रदेशात कर्जमाफी दिली त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या शेतक-यांनाही कर्जमाफी द्यावी. उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात शेतक-यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कैक पटींनी जास्त आहे. तसेच महाराष्ट्राची आर्थिक क्षमताही उत्तर प्रदेशपेक्षा मोठी आहे. आपणच राज्यातील तूर उत्पादकांना शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरु राहतील असा शब्द आपण दिला होता. परंतु फक्त 22 एप्रिल पर्यंतच नोंद झालेल्या शेतक-यांची तूर खरेदी करण्याचे आदेश दिल्याने आपल्याच मंत्र्यांच्या घाई करू नका रांगेत उभे राहण्याची गरज नाही या शब्दावर आणि तुमच्या शब्दावर विश्वास ठेवणा-या शेतक-यांना फसगत झाल्याचे वाटत आहे. आम्हाला बरे वाईट बोलण्याने आपले समाधान होत असेल तर तसेही बोलून कृपया राज्यातील शेतक-यांची सर्व तूर खरेदी करावी आणि शेतक-यांना कर्जमाफी द्यावी असे अशोक चव्हाण म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पारोळात घराचं छत कोसळलं, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

News Desk

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, उद्या ‘हे’ मंत्री घेणार शपथ

News Desk

…ही तर अघोषित आणीबाणीचः खा. अशोक चव्हाण

News Desk