HW News Marathi
महाराष्ट्र

मेट्रोमुळे होणारी वृक्षहानी कमी करण्यासाठी गट स्थापन

मुंबई शहरात होत असलेल्या मेट्रो -3 प्रकल्पामुळे वृक्षसंपदेची कमीत कमी हानी होण्यासह वृक्षतोडीमुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांचा एक गट स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुंबई शहरात मेट्रो प्रकल्पामुळे वृक्षसंपदेची हानी होत असल्याची तक्रार घेऊन नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. या शिष्टमंडळात आशीष पॉल, नीना वर्मा, परवीन जहांगीर, संजय अशर, झोरू भाथेना याचा समावेश होता. मेट्रो प्रकल्पाला आमचा विरोध नाही. हा प्रकल्प नागरिकांसाठी आवश्यक असून यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत मिळणार आहे.असेही या शिष्टमंडळाने स्पष्ट केले.

एमएमआरसीएल अधिकाऱ्यांचा हा गट प्रमुख नागरिकांसोबत संवाद साधेल आणि कमीत कमी वृक्षतोड करण्याबाबत विचारविनिमय करेल

मेट्रो रेल हा एकमेव किफायतशीर वाहतुकीचा पर्याय असून त्यामुळे कार्बन फूटप्रिंट कमी होण्यास मदत होते या मुख्यमंत्र्यांच्या मताशी शिष्टमंडळाने सहमती दर्शविली..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Poladpur Bus Accident | मृतांच्या नातेवाईकांकडून सावंत-देसाईंच्या नार्को टेस्टची मागणी

News Desk

गडहिंग्लज कारखान्यातही 100 कोटींचा घोटाळा, हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांचा दुसरा हल्ला!

News Desk

मराठा आंदोलकांसाठी दिवाकर रावतेंनी मोठी घोषणा

swarit