HW News Marathi
महाराष्ट्र

रस्त्यासाठी विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातच शाळा भरो आंदोलन

उत्तम बाबळे नांदेड :- रेती वाहतुक करणा-या जड वाहनांच्या ये जा ने खड्डेमय झालेल्या रस्त्यावरुन बस किंवा अन्य कोणतेही खासगी वाहन त्या रस्त्यावरुन जाण्यास तयार होत नसल्याने माै.डोणवाडा येथील विद्यार्थ्यांचे रस्त्या अभावी शैक्षणीक नुकसान होत असून तालुका प्रशासनाने याची दखल न घेतल्याने रेती साठे हटविण्यात यावीत व तात्काळ रस्ता दुरुस्त करुन विद्यार्थ्यांची कुचंबना थांबवावी या मागणीसाठी ४५ विद्यार्थ्यांनी चक्क नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातच शाळा भरोस आंदोलन करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

लोहा तालुक्यातील माै.डोणवाडा हे अल्प लोकसंख्येचे गाव आहे.यामुळे येथे केवळ प्राथमिक शाळा असल्याने पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना तालुकास्थानी लोहा येथे जावे लागते.सर्व शिक्षा अभियानांतर्गत मानव विकास मिशन योजनेतील राज्य परिवहन महामंडळाची बस या गावी यायची व विद्यार्थी त्या बसद्वारे लोहा येथे जायचे.परंतू काही दिवसांपासून ती बस या गावी येणे बंद झाली.तसेच अन्य खासगी वाहने देखील येत नाहीत.त्याचे कारण असे की,माै.डोणवाडा ते कुंभारगाव या दरम्यानच्या ८ कि.मि.अंतरातील रस्त्याच्या दुतर्फा काही ठेकेदार व काही अवैध रेती विक्रेत्यांनी रेतीचे मोठे साठे जमा केले व करत आहेत.यासाठी रेती वाहतुक करण्या-या जड वाहनांची सतत २४ तास ये जा चालू असल्याने सदरील रस्ता खड्डेमय झाला असून रस्त्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता ? असे चित्र झाले आहे.यामुळे वाहन धारकांना या रस्त्यावरुन जातांना तारेवरची कसरत करावी लागत असून वाहने नादुरुस्त होत असल्याने त्यांचे मोठे आर्थीक नुकसान होत आहे.या बाबी लक्षात घेऊन बससह अन्य वाहनांनी या रस्त्यावरुन प्रवास करणे बंद केले आहे.पावसाळा व त्यात पायपीट,यामुळे विद्यार्थ्यांना लोहा येथे जाणे अशक्य झाल्याने त्यांचे मोठे शैक्षणीक नुकसान होत आहे. पालक व विद्यार्थ्यांनी लोक प्रतिनिधी आणि तालुका प्रशासनाकडे याबाद निवेदने केली.परंतू याची कोणीही दखल घेतली नाही.त्यामुळे या सर्वांचा पालक व विद्यार्थ्यांनी तीव्र जाहीर निषेध व्यक्त केला.तसेच जिल्हा प्रशासनाचे लक्ष याकडे वेधण्यासाठी ५ जुलै २०१७ रोजी माै.डोणवाडा येथील ४५ विद्यार्थीनींनी चक्क नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शाळा भरविली.तसेच त्यांच्या सोबत पालकांनी एका निनेदनाद्वारे त्या रस्त्यावरील रेती साठे अन्यत्र हलऊन डोणवाडा ते कुंभारगाव हा रस्ता त्वरीत दुरुस्त करण्यात यावा व वाहने पुर्ववत सुरु करावेत अशी मागणी केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांना ते निवेदन देण्यात आले असून जिल्हा प्रशासन याची काय दखल घेईल ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकमध्ये भाजपच्या ‘या’ नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट!

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी-अंबानीचे स्पिकर !

News Desk

आता मराठा समाजाच्या मुलांनी पुढे काय करायचं हे सरकारनं सांगावं? संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk