HW News Marathi
महाराष्ट्र

लातूर, चंद्रपूर व परभणी मनपासाठी 19 एप्रिलला मतदान

 

मुंबई – राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी शांत होण्याच्या आतच लातूर, चंद्रपूर आणि परभणी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आज घोषणा करण्यात आली. येत्या 19 एप्रिलला या तीनही महापालिकेसाठी मतदान होणार आहे. तर 21 एप्रिलला मतमोजणी केली जाणार आहे. त्यासाठी संबंधित महानगरपालिका क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स.सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

मुदत समाप्तीपूर्वी या महानगरपालिकांच्या निवडणुका घेणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेची 29 एप्रिल, लातूर महानगरपालिकेची 20 मे आणि परभणी महानगरपालिकेची मुदत 15 मे रोजी संपत आहे. भारत निवडणूक आयोगाने 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदार संघाची मतदार यादी या महानगरपालिका निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे 27 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रे रविवारी . 2 एप्रिलपर्यंत स्वीकारण्यात येतील. 28 मार्च रोजी गुढी पाडव्याची सुट्टी असल्याने त्या दिवशी नामनिर्देनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत; परंतु रविवारी 2 एप्रिल रोजी ती स्वीकारण्यात येतील, असे सहारिया यांनी सांगितले.

त्याबरोबरच सांगली- मीरज- कुपवाड महानरपालिकेतील प्रभाग क्र. 22ब, जळगाव महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 24अ आणि कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 46 च्या रिक्तपदासाठीदेखील 19 एप्रिलला मतदान होईल. तसेच धुळे जिल्हा परिषदेच्या शिरूड (ता. धुळे) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या दानापूर (ता. तेल्हारा) निवडणूक विभागाच्या; तर अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील 19 एप्रिलला मतदान होणार आहे. 21 एप्रिलला मतमोजणी होईल.

या महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे

– नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 27 मार्च ते 3 एप्रिल

– नामनिर्देशनपत्रांची छाननी- 5 एप्रिल

– उमेदवारी मागे घेणे- 7 एप्रिल

– निवडणूक चिन्ह वाटप- 8 एप्रिल

– उमेदवारांची अंतिम यादी- 8 एप्रिल

– मतदान- 19 एप्रिल (सकाळी 7.30 ते सायं. 5.30)

– मतमोजणी- 21 एप्रिल

ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये कुठल्याही प्रकारे फेरफार करणे शक्य नसल्याची खात्री इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीकडून करून घेण्यात आली आहे, असे स्पष्ट करून सहारिया म्हणाले की, या सर्व निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (ईव्हीएम) वापर केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषत: महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत विविध तक्रारी आणि सूचना प्राप्त झाल्या होत्या. काही जणांनी आगामी निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा म्हणजेच वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेलचा (मतदानाच्या अचुकतेची पावती दर्शविणारे यंत्र) वापर करावा, अशा सूचनाही केल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर करण्यास सुरूवात करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 8 ऑक्टोबर 2013 रोजी दिले आहेत. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याच धर्तीवर या यंत्राचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापर करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे; परंतु या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होतात. त्या अनुषंगाने या यंत्रात बदल करण्यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला कळविण्यात आले होते. त्यांनी आवश्यकतेनुसार प्राथमिक स्वरूपात हे यंत्र तयार केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी – माजी आमदार, पराभूत उमेदवारांची बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत संपन्न!

News Desk

नांदेड जिल्ह्यातील अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला इशारा  

News Desk

राज्यात पावसामुळे मृत व्यक्तींचा आकडा १४५ वर

News Desk