HW News Marathi
महाराष्ट्र

शेतक-याने विहीरीतच उपोषणाला बसला,सात बारावरील बोजा कमी झाला नाही तर, विष पिऊन आत्महत्या करण्याचा इशारा

अ.नगर : अकोले तालुक्यील मन्याळे गावातील एका शेतक-याने शेतातील विहीरीतच उपोषणाला बसला आहे. शेतक-याचे घर आणि शेती पतसंस्था जप्ती करणार असल्याने उपोषणाचे पाऊल उचलले आहे. घर आणि शेती जप्ती झाल्यास विहीरीतच विष पिऊन आत्महत्या करण्याचा इशारा शेतक-याने दिले आहे.

जोपर्यंत आपल्या सात-बारावरील बोजा कमी केला जात नाही आणि सोमवारी होणारी जप्ती थांबत नाही. तोपर्यंत विहीरीच्या बाहेर येणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्याने घेतली आहे.

२००५ मध्ये जाधव यांनी अकोलेच्या यशोमंदिर पतसंस्थेतून दीड लाख रुपये कर्ज घेतले होते.

सततचा दुष्काळ, नापीकी आणि पीक आले तरीही भाव नाही. अशा परीस्थितीत जाधव कर्ज भरू शकले नाहीत. आता या कर्जाचे व्याजासह जवळपास सहा लाख रुपये झाले आहेत. वसुलीसाठी पतसंस्था सोमवारी या शेतकऱ्याची 10 एकर जमीन आणि घर जप्त करणार आहे. अनेकदा दाद मागुनही सरकार माझ्यावर अन्याय करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रस्त्यांच्या निर्मितीमुळे ग्रामीण भागात विकासाला चालना! –  यशोमती ठाकूर

Aprna

महाविकासआघाडीचा रिमोट माझ्या हातात नाहीच, पण…! अखेर शरद पवारांची कबुली

News Desk

चंद्रकांत पाटलांनी पदविधारांसाठी काय केलं? | जयंत पाटील

News Desk