HW News Marathi
महाराष्ट्र

सरकासोबत अनेक अदृष्य हात

मुंबईः भाजप-शिवसेनेमध्ये कुरबुरी होत असतात,मात्र शिवसेनेसोबत पाच वर्ष गुण्यागोविंदाने सरकार चालवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. परंतु शिवसेनेने साथ सोडली तर अनेक अदृश्य हात सरकार वाचवण्यासाठी तयार असून त्यामुळे राज्यात कोणताही भूकंप होणार नाही, तसेच या सरकारला कोणताही धोका ना असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले. दरम्यान,कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येणार आहे, पण विकासकामांसाठी वेगळा प्लॅन तयार आहे, तसेच शेतक-यांसाठी आपण कोणाशीही चर्चा करायला तयार असून चर्चेने कमीपण येत नाही, कोणी लहान होत नाही आणि कोणी मोठेही होत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

समृद्धी महामार्गावरुन सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना त्यांनी सांगितलं की, शेतक-याची शेती न जाता झाला असा एक प्रोजेक्ट दाखवा. देशात आजपर्यंत देण्यात आलेली नाही इतकी नुकसानभरपाई आम्ही शेतक-यांना देत आहोत. आम्ही शेतक-यांवर जबरदस्ती केलेली नाही. अनेकजण आमच्यासोबत आहेत. शेतक-यांशी संवाद केल्यानंतर जमीन मिळवणार आहोत. काहींच्या जमिनी नसतानाही शेतकरी नेते म्हणून आंदोलन करत आहेत असा टोलाही त्यांना यावेळी लगावला. सोबतच सामंजस्य करारांचं प्रत्यक्षात रुपांतर करण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी असून हा टक्काक गुजरात, कर्नाटकपेक्षाही जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. दिल्लीला जाण्यासंबंधी प्रश्न विचारला असता, ‘ज्या दिवशी माध्यमांमध्ये बातम्या नसतात तेव्हा मी दिल्लीला जाणार असल्याच्या बातम्या देत असतात. माझा आणि माझ्या पक्षाचा असा कोणताही विचार नाही, असं मिश्किल उत्तर त्यांनी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कंगना राणावत से दूर रहो”, गृहमंत्र्यांना धमकीचे फोन सुरूच…

News Desk

राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्यात शिवसेनेच्या मंत्र्याचा हस्तक्षेप?

News Desk

जलयुक्त शिवार योजनेत सहभागी असलेल्या त्यांची पण चौकशी होणार का?

News Desk