HW News Marathi
महाराष्ट्र

हुतात्मा अंभोरेंना परभणीकरांचा भावपूर्ण निरोप

परभणी :दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर खोऱ्यात हिमस्खलन झालं होतं. त्यात हुतात्मा झालेले परभणीचे जवान बालाजी अंभोरे यांना त्यांच्या ताडकळस या मूळ गावी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. तत्पूर्वी सकाळी त्यांचा मृतदेह विमानाने औरंगाबाद आणि नंतर वाहनातून ताडकळसला आणण्यात आला. गावातील जिल्हा परिषद शाळेत काही काळ गावच्या सुपुत्राचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. अत्यंत शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. बालाजी अंभोरे अमर रहे अशा घोषणांनी या वेळी परिसर दणाणून गेला. नंतर लष्कर आणि पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून अंबुरे यांना मानवंदना दिली आणि मग अंत्यसंस्कार करण्यात आले. अंबुरे यांच्या पश्चात वडील, आई पत्नी व एक लहान भाऊ असा परिवार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे

News Desk

बंगालमध्ये ममतांच्या विजयामागे शरद पवारांचा अदृश्य हात,राष्ट्रवादीचा दावा !

News Desk

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकलेंची एन्ट्री, थेट उद्धव ठाकरेंनाही केले ‘हे’ आवाहन

News Desk