HW News Marathi
महाराष्ट्र

१२वी पेपर तपासणीत असहकाराचा इशारा

मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या दीर्घकाळ प्रलंबित आश्वासित आणि मान्य झालेल्या मागण्यांवर १० दिवसात अंमलबजावणी झाली नाही, तर ३ मार्च २०१७पासून १२वीच्या पेपर तपासणीत असहकार करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात म.रा.क.महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख म्हणाले की, शिक्षणमंत्र्यांनी वेळोवेळी आश्वासने देऊन अंमलबजावणी झाली नाही म्हणून संघटनेने २९ नोव्हेंबर आणि २२डिसेंबर २०१६ रोजी आझाद मैदानावर इशारा आंदोलने केली होती. तसेच १२ जानेवारी २०१७रोजी ‘जेल भरो’ आंदोलनही केले होते. तेव्हा शिक्षणमंत्र्यांनी १५ दिवसात अंमलबजावणीचे आश्वासन दिले आणि तेही हवेतच विरले.

अधिकारी जर शिक्षणमंत्र्यांचे ऐकत नसतील, तर अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कडक

कारवाई झाली पाहिजे आणि शिक्षकांवरील अन्याय त्वरित दूर व्हायला हवा. अन्यथा असहकार आंदोलन करावे लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारचीच असेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडेंवर नाव न घेता टीका!!

News Desk

मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या काळ्या कारभाराची पोलखोल करणार, कॉंग्रेसची उद्या राज्यभर निदर्शन

News Desk

गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा…!

Aprna