HW News Marathi
Covid-19

राज्यात १ हजार ६३२ नवीन करोनाबाधित, ४० रूग्णांचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू नियंत्रणात येत आहे. शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ६३२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १ हजार ७४४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचप्रमाणे, याच एका दिवसात ४० रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे, आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा ६४ लाख ३२ हजार १३८ वर पोहोचला आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९७.४६ टक्के इतका झाला आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ९९ हजार ८५० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील रुग्णसंख्या जरी नियंत्रणात येत असली तरीही निश्चितच मृत्यूंचा आकडा चिंताजनक आहे. त्यामुळे, हळूहळू राज्यातील लोकांचं जनजीवन सुरळीत होतं असलं तरीही कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे, नागरिकांनी खबरदारी घेणं आणि जबाबदारीने वागणं अत्यंत आवश्यक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार !

News Desk

लाॅकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटली तरी अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली जाऊ नये !

News Desk

राज ठाकरेंचं पुन्हा मोदींना पत्र, राज्य सरकारला ‘या बाबीसाठी परवानगी देण्याची केली विनंती!

News Desk