HW News Marathi
महाराष्ट्र

निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही! – रोहित आर आर पाटील

सांगली |  कवठेमहांकाळ निवडणुकीत प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. राष्ट्रवादीच्या शेवटच्या प्रचार सांगता सभेत रोहित पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. रोहित पाटील म्हणाले, “१९ तारखेला निकाल स्पष्ट होईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आत्ता ज्यांच्याहाती १५ वर्षे सत्ता होती.  नगरपंचायत होती आज तेच लोक आदर्श नगरपंचायत घडविण्यासाठी एकत्र आलो आहे,” असे म्हटले.

आदर्श घोटाळा ऐकला होता. आता आदर्श नगरपंचायत काय पाहिजे हे सांगतो. जे लोक संडासच्या बाथरूममध्ये पैसे खातात त्या लोकांची वृत्ती सुद्धा तिथे बसण्याचीच असू शकते. मी कवठेमहांकाळचा परिसर संपूर्ण पिंजून काढला आहे. विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे हे मला माहित आहे. विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे, जे लोक मला सल्ले देण्याचे काम करत आहेत त्यांनी या शहरात काय विकास कामे प्रलंबित आहेत त्यांनी माझ्या पुढे येऊन सांगावे. बघूया कोण काय सांगत किती विकास झालाय आणि किती विकास व्हायचा राहिलाय. असे आव्हान रोहित आर आर पाटील यांनी कवठेमहांकाळ येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सांगता समारंभ प्रसंगी बोलताना दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल- संजय राऊत

News Desk

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोडांना क्लिनचीट?

News Desk

वेतन पडताळणी पथक १८ ते २१ जुलै दरम्यान नांदेडच्या दौऱ्यावर 

News Desk