HW News Marathi
महाराष्ट्र

“केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या लोकांमुळे भाजपचं एक मत जरी वाढत तर स्वागतच”

मुंबई। खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्यानं भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. दरम्यान आज पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांनाच केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपचा जनाधार वाढणार की घटणार? याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. त्याबाबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना (९जुलै) आजच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत मिश्किलपणे उत्तर दिलं आहे. मंत्रिपद मिळालेल्या लोकांमुळे भाजपचं एक मत जरी वाढत असेल तर त्याचंही स्वागत आहे, असं मिश्किल उत्तर पंकजा मुंडे यांनी दिल आहे.

मुंडे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आम्ही कष्ट केले ते पक्षासाठी केले. माझ्याकडे येणारी गर्दी ही पक्षासाठीच आहे. त्यामुळे मी वेगळी आहे आणि पक्ष वेगळा असं मानत नाही. आणखी कोणी म्हणत असेल तर मला त्याबाबत काही म्हणायचं नाही, असं सांगतानाच पक्षात जे नवीन अॅडिशन झालं. त्याचं स्वागत आहे. ज्यांना मंत्रिपद मिळालं त्यांचंही स्वागत आहे. त्या मंत्रिपद मिळालेल्या लोकांमुळे भाजपचं एक मत जरी वाढत असेल तर त्याचंही स्वागत आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

निर्णय न पटण्याचा प्रश्नच नाही-

पक्षाचा निर्णय न पटण्याचा प्रश्नच नाही. पक्षाची एक पद्धत आहे. मला पक्षाचा फॉर्म भरायला लावला आहे. तेव्हा मी पात्र आहे का असं विचारलं होतं. त्यानंतर पक्षाने मला फॉर्म भरायला लावला. त्यानंतर त्यांनी रमेश आप्पा कराडांना पक्षाने फॉर्म भरायला लावला. आमच्या पक्षात पक्ष हा अंतिम असतो. त्यामुळे निर्णय पटणं न पटणं हा प्रश्नच नसतो, असं त्यांनी सांगितलं.

प्रीतम यांची चर्चा त्यांच्या वलयामुळे-

प्रीतमताईंचं नाव होतं ते योग्य होतं. असं नाही की ते अयोग्य होतं. केवळ मुंडे साहेबांची कन्या म्हणून नाही तर त्या विक्रमी मतांनी निवडून आल्या आहेत. त्यांनी पक्षाचं काम केलं आहे. त्यांनी कोणतीही बैठक बुडवली नाही. त्या नेहमी सक्रिय राहिल्या, त्या कष्टाळू आहेत. हुशार आहेत. महिला आहेत. तरुण आहेत. बहुजन चेहरा आहे. त्यामुळे त्यांचं नाव न येण्यासारखं त्यामध्ये काही नाही आहे. अनेक लोकांची नावं चर्चेत होती. त्यांची नावं आली नाही. पक्षाने एखादा निर्णय घेतला. चर्चा ही त्या नावाच्या वलयामुळे होत आहे. त्यामुळे त्याला विराम द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा – जयकुमार रावल

swarit

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या आंबा महोत्सवात आग

swarit

पूर, दरड समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंटे समितीची स्थापना!

News Desk