HW News Marathi
महाराष्ट्र

फोन टॅपिंगच्या चौकशीसाठी समिती गठीत, भाजपला भोवण्याची चिन्हे!

मुंबई। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी आपला फोन टॅपझाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही नाना पटोले यांनी आपला फोन अनिष्ट राजकीय हेतून गैरपद्धतीने टॅप केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. केवळ आपलाच नाही तर इतर राजकीय नेत्यांचेही फोन टॅप केले असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश पावसाळी अधिवेशनात दिले होते आणि याच पार्श्वभूमीवर आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.

यात भाजप सरकारच्या काळात झालेलं फोन टॅपिंगचं प्रकरण भाजपला भोवण्याची चिन्हे दिसत आहे.

फोन टॅपिंग चौकशी-

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती चौकशी करणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान दिले होते.नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा सदस्य नाना पटोले यांची फोन टॅपिंगची तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी फोन टॅपिंगची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असताना पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर आघाडीच्या आमदारांचा फोन बेकायदा टॅप केल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात शुक्ला यांचीही चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.

अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळात फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला. २०१६- १७ मध्ये राज्यातील आमदार खासदारांचे फोन टॅप करण्यात आले होते. समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले, यासाठी माझा फोन नंबर ‘अमजद खान’ नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी सभागृहात केली.

तर अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे दाखवून माझा फोन टॅप करण्यात आला. नंबर माझा आणि अमजद खान असे मुस्लीम नाव ठेवण्यात आले. मुस्लीम धर्माचे नाव देऊन हिंदू मुस्लीम वाद निर्माण करुन राजकारण करायचे होते काय? माझ्यासह इतर काही लोकप्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात आले. अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. लोकप्रतिनिधींना सार्वजनिक जीवनातून बरबाद करण्याचे काम करण्याचा हा प्रयत्न आहे, असा घणाघातही नाना पटोलेंनी सभागृहात केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भररस्त्यात मंत्रालयबाहेर अंधारातच भरवला जनता दरबार..

News Desk

ठाकरे सरकार-राज्यपाल वाद पुन्हा नव्या विषयावरुन पेटला, राज्यपालांना सरकारी विमान नाकारलं

News Desk

महाड इमारत दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू तर ९ जण बचावले

News Desk