HW News Marathi
महाराष्ट्र

टोपेंची मोठी घोषणा, कोरोनामुक्त करणाऱ्या उत्कृष्ट ग्रामपंचायतींना देणार पुरस्कार!

जालना। जालना जिल्ह्यातील सध्याच्या कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री राजेश टोपे बोलत होते. जालना जिल्ह्यात कोविड १९ मुक्त झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातून उत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या तपासणीवेळी ८० टक्के गुण हे लसीकरणसाठी, १० टक्के गुण हे आरटीपीसीआर व अँटिजेन तपासणीसाठी तर १० टक्के गुण हे कोविड-१९ च्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझरचा वापर तसेच सुरक्षित अंतराचे पालन या बाबींचे कटाक्षाने पालन करण्यासाठी देण्यात येणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जालना जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात यावी. तसेच लसीकरण केंद्रांची संख्या वाढवत लसीकरण गतीने करण्याचे आदेशश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. तसेच जालना जिल्ह्यात कोविड १९ मुक्त गावांची तपासणी करण्यात येऊन उत्कृष्ट ठरणाऱ्या प्रत्येक तालुक्यातून तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचीही मोठी घोषणा राजेश टोपे यांनी केली आहे. प्रत्येक तालुक्यातून तीन या प्रमाणे २४ ग्रामपंचायतीची व जिल्हास्तरावर एक अशा एकूण २५ ग्रामपंचातीची निवड करण्यात येणार आहे. शिवाय या ग्रामपंचायतींना १५ ऑगस्ट रोजी बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिली. जालना जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी होताना दिसत असून त्याची संख्या वाढविण्याची गरज आहे.

लोरिस्क व हायरिस्क सहवासितांचा शोध घेऊन त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात याव्यात, असे निर्देश राजेश टोपे यांनी दिले. तसेच जालना जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर हा आज जरी कमी असला तरी हा दर भविष्यात वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे असेही राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच ज्या बालकांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा प्रकारची कोव्हिडची लक्षणे असतील तर प्रत्येकाची तपासणी करण्याच्या सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मास्क, सुरक्षित अंतराचे पालन याबरोबरच लसीकरणही तेवढेच महत्वाचे आहे, जालना जिल्हा लसीकरणाच्या बाबतीमध्ये ईतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये मागे राहू नये यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अधिक दक्षपणे जनजगृती करण्यात यावी. जिल्ह्यात लसीकरणासाठी केंद्रांच्या संख्येत अधिक वाढ करण्यात येऊन सातही दिवस लसीकरण केले जाईल, यादृष्टीने नियोजन करण्याबरोबरच दैनंदिन लसीकरणाचे उद्दिष्ट ठरवुन देण्यात यावे, असेही टोपे म्हणाले.

तसेच लसीकरणाच्या या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायत, तहसील कार्यालय, उप विभागीय कार्यालयांनी हिरिरीने सहभाग नोंदवत ही मोहीम यशस्वी करण्याच्या सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध कडक केले आहेत. सायंकाळी ५ वाजेनंतर मुक्त संचारास बंदी करण्यात आली आहे. लग्नसमारंभ तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच विनामास्क कोणीही फिरणार नाही, यादृष्टीने काळजी घेत शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अधिकाऱ्यांनी मला न विचारताच निर्णय घेतला”, आपल्याच खात्यावर विजय वडेट्टीवारांची नाराजी!

News Desk

“पूरग्रस्त भागातील दौरे टाळा”, शरद पवारांचं नेत्यांना आवाहन

News Desk

तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का? ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सदाभाऊ खोतांचा पवारांना सवाल!

News Desk