HW News Marathi
महाराष्ट्र

राजीनामा घेण्यात आला नाही तर मी स्वतः दिला, राठोडांचा नविन प्लान

औरंगाबाद। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. मात्र ते लवकरच माघारी परतणार असल्याचं वक्तव्य शिवसेना मंत्र्यांनी केलं होतं. मात्र आज संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. मी सध्या राज्यभर दौरा करणार आहे. तांड्यांवर-वाडीवर राहणाऱ्या माझ्या समाजाला भेटणार आहे. त्यांच्या अडचणी समजून घेणार आहे. आणि शेवटी मुख्यमंत्री यांना भेटून समाजाची बाजू मांडणार. माझा राजीनामा घेण्यात आला नाही तर मी स्वतः राजीनामा दिला होता. कारण असे आरोप झाल्यावर वेगळे होणे गरजेचे होतं. माझे नेते उद्धव ठाकरे यांचा आदेश माझ्यासाठी महत्वाचा आहे. सध्या त्या प्रकरणात चौकशी सुरू आहे. दोषी आढळले तर मी बाहेर जाईन. मात्र निर्दोष सिद्ध झालो तर माझ्याबद्दल काय निर्णय घ्यायचा याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, अशी भूमिका माजी वनमंत्री संजय राठोड यांनी मांडली. त्यामुळे सध्या समाजातील लोकांनी भेट घेण्याचा प्लान संजय राठोड य़ांनी आखला आहे. यापुढे काय होणार, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतली, असं राठोड यावेळी म्हणाले.त्यामुळे सध्या समाजातील लोकांनी भेट घेण्याचा प्लान संजय राठोड य़ांनी आखला आहे. यापुढे काय होणार, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतली, असं राठोड यावेळी म्हणाले.

काय म्हणाले होते उदय सामंत-

संजय राठोड यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. पण, त्यांची कामाची पद्धत पाहता त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, लवकरच ते मंत्रिमंडळात सामील होतील, असं सूचक विधान उदय सामंत यांनी केलं होतं. संजय राठोड हे मंत्रिपदावरून पायउतार झाले आहे. बंजारा समाजाचे ते मोठे नेते आहे. त्यांची कार्यशैली ही उत्तम आणि धडाडीची होती. त्यामुळे अशा नेत्यांची शिवसेनेला गरज आहे. या प्रकरणातून त्यांची सुटका झाल्यास लवकरच ते मंत्रिमंडळात येतील, असं उदय सामंत म्हणाले.

महंत सुनील महाराज काय म्हणाले होते?

पोहरादेवी संस्थान हे बंजारा समाजाचं आराध्य दैवत मानलं जातं. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर त्यांनी कोरोनाकाळात पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन केलं होतं. ज्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायला लागला होता. त्यावेळीही पोहरादेवीच्या महंतांनी राठोड यांना राजीनामा न देण्याची विनंती केली होती. त्यातच उदय सामंत यांच्यासारख्या शिवसेना नेत्याने संजय राठोड यांच्या पुनरागमनाचे संकेत दिल्यामुळे आता नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चित्रा वाघ यांच्यावर भाजपचा आणखीनच दृढ विश्वास ! सोपवली नविन जबाबदारी

News Desk

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख पत्रकार परिषदेत का रडले? काय आहे नेमके प्रकरण? 

News Desk

मागासवसर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करणार  – रामदास आठवले

News Desk